AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video खुशखबर! शंकरपटांना पुन्हा सुरुवात होणार, सुनील केदार यांची माहिती

महाराष्ट्र सरकारनं बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबत 2017 मध्ये कायदा संमत केला होता. परंतु, त्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सुनील केदार हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची भेट घेतली.

Video खुशखबर! शंकरपटांना पुन्हा सुरुवात होणार, सुनील केदार यांची माहिती
शंकरपट
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 15, 2021 | 4:19 PM
Share

नागपूर : राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची सुनील केदार यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर बैलगाड्या शर्यती राज्यात सुरू होणार असल्याची ग्वाही केदार यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारनं बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबत 2017 मध्ये कायदा संमत केला होता. परंतु, त्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सुनील केदार हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची भेट घेतली.

राज्य शासन पाठपुरावा करतेय

कर्नाटक, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगड येथे बैलगाड्यांची शर्यत सुरू आहे. मात्र, उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानं बैलगाड्या शर्यती महाराष्ट्रात बंद आहेत. यासंदर्भात केदार यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा केली. बैलगाडी शर्यत सुरू व्हावी, यासाठी राज्य शासन पाठपुरावा करीत आहे. यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीनं वरिष्ठ अधिवक्ता म्हणून अॅड. मुकुल रोहतगी, अॅड. शेखर नाफडे आणि अॅड. सचिन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती केदार यांनी दिली.

खिल्लारचे संगोपन आवश्यक

शंकरपटाच्या शर्यतीसाठी खिल्लार बैलाची निवड केली जाते. खिल्लार ही महाराष्ट्रात सापडणारी बैलांची जात आहे. शर्यंत बंद असल्यानं खिल्लारच्या बैलांची मागणी कमी झाली आहे. आपली संस्कृती जपली पाहिजे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नक्कीच यश मिळणार, असल्याचं त्यांनी सांगितलं. शंकरपटांअभावी गावांमध्ये यात्रा भरत नाहीत. बैलगाड्यांची शर्यत ही राज्यात 400 वर्षे जुनी आहे. त्यामुळं जुन्या परंपरा जपणे आवश्यक असल्याचं केदार म्हणाले. शेतीचा हंगाम संपला की शंकरपटांना सुरुवात होते. यासाठी खास बैलांची निवड केली जाते. त्यांना शेकड्याला जुंपले जाते. त्यासाठी बैलांना शर्यतीचा सराव करावा लागतो. बैलांना विशिष्ट खुराग दिली जाते. त्यामुळं ते शर्यतीत टिकतात. जिंकणाऱ्या जोड्यांना बक्षीस दिली जातात.

इतर बातम्या 

राजीनामा देऊन नाराजी कळवली, वेट अँड वॉच नंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय भूकंपाने वर्धा हादरले

Z. P. च्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेच नाही, दिवाळीनंतर झाल्या शाळा सुरू

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक