AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान केलं. पण, काँग्रेसच्या नगरसेवकांनीच काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं नाही, असा आरोप दुनेश्वर पेठे यांनी केलाय.

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?
दुनेश्वर पेठे, नागपूर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 1:09 PM
Share

नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटल्यावरुन नागपुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे मतं फुटल्याचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलंय. नियोजन नसल्यानं काँग्रेसची 40 पेक्षा जास्त मतं फुटलीत. राष्ट्रवादी काँग्रेसचं नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी हा गौप्यस्फोट केलाय. महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान केलं. पण, काँग्रेसच्या नगरसेवकांनीच काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं नाही, असा आरोप दुनेश्वर पेठे यांनी केलाय.

विधान परिषदेची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिंकली. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या 22 मतदारांनी विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे. यात कुणी भाजपच्या विरोधात मतदान केलं, याचा शोध घेतला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व फंडे वापरले. मतदारांना आठ ते दहा दिवस सहलीला घेऊन गेले. मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणले. एकूण 334 मतदार भाजपच्या गोटात होते.

भोयरांना मिळालेलं एक मतं कुणाचं?

एकूण 559 मतदारांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक मतदार सोबत होते. मात्र, तरीही भाजपच्या गणितात काही मतं फुटल्याची बाब समोर आली. असं होऊ शकते, याचा अंदाज बावनकुळे यांना होता. त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीच्या बहुतेक उमेदवारांशी संपर्क साधला. मतदान करण्याची विनंती केली. उमेदवार या नात्याने सर्वच मतदारांच्या भेटी घेतल्या. बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 तर रवींद्र भोयर यांना एक मत मिळाले. ते कुणी दिलं ते शोधणार असल्याचं भोयर यांचं म्हणणंय. पाच मते अवैध ठरली. 176 मतांची आघाडी घेऊन त्यांनी निवडणूक जिंकली.

भाजपची 22 मते फुटल्याची शक्यता

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच अपक्ष मते बावनकुळे यांनी आपल्याकडे वळती केलीत. म्हणून त्यांचा विजय तसा सुकर झाला. पण, तरीही भाजपची 22 मते फुटल्याचे निदर्शनास आलंय. याचा शोध घेतला जातोय. मात्र, सर्वाधिक फुटलेली मते ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी असलेल्यांमध्ये भाजपचे सहा सदस्य आहेत.

क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाली. याची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली. लक्ष्मीदर्शन करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई होणार असल्याचंही सांगण्यात येतंय. कॉंग्रेस आणि भाजपला अपेक्षपेक्षा कमी मतं मिळाली. विरोधकांची मते मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.

Accident | कारध्यात कंटेनरची दुचाकीला धडक, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Nagpur | मनपा शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट; शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.