AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात ढगफुटी आणि महापुरामुळे मोठं नुकसान; यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोल्या जिल्ह्यांना बसला फटका

यवतमाळ, वाशिम, बुलडाणा अणि अकोल्या जिल्ह्यात हे सर्वाधिक नुकसान आहे. शेती खरडून गेल्याने पुन्हा पेरणी कशी करायची हा प्रश्न? शेतकऱ्यांना पडलाय.

विदर्भात ढगफुटी आणि महापुरामुळे मोठं नुकसान; यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोल्या जिल्ह्यांना बसला फटका
| Edited By: | Updated on: Jul 23, 2023 | 5:09 PM
Share

नागपूर : पुरात शेतीच वाहून गेलीय. त्यामुळे पेरायचं काय आणि जगायचं कसं? हा प्रश्न पडलाय यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरातील योगेश जाधव या तरुण शेतकऱ्याला. उसणवारी करुन त्यांनी यंदा १० एकरात कपाशीची लागवड केलीय. दोन-तीन लाखांचा खर्च केला. पिकंही चांगलं होतं. पण एका दिवसाच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. पुरात संपूर्ण शेती खरडून गेल्याने त्याच्यावर मोठं संकट ओढवलंय.

अशाच प्रकारे विदर्भात गेल्या दोन दिवसात ८ ते १० हजार हेक्टर शेती खरडून गेलीय. विदर्भात ढगफुटी आणि महापुरामुळे शेतीचं सर्वाधिक नुकसान झालंय. यवतमाळ, वाशिम, बुलडाणा अणि अकोल्या जिल्ह्यात हे सर्वाधिक नुकसान आहे. शेती खरडून गेल्याने पुन्हा पेरणी कशी करायची हा प्रश्न? शेतकऱ्यांना पडलाय.

या गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात पुराचा हाहाकार बघायला मिळतो आहे. पैनगंगा-वर्धा-झरपट नद्यांना पूर आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र 24 तासापासून पाऊस बंद झालाय. मात्र यवतमाळ-नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पुराचे कारण ठरली आहे. वनसडी -अंतरगाव , भोयगाव -धानोरा मार्ग बंद झाला आहे. परसोडा, रायपूर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, अंतरगाव इरई, कारवा, भोयगाव भारोसा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अंतरगाव येथे घरांत पुराचे पाणी शिरले.

हजारो घरांना पुराचा विळखा

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरालगतची इरई नदी ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील सखल आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे ले-आउट मधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय. चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट नद्यांच्या किनाऱ्यावर आहे. या नद्यांचं पाणी हे वर्धा नदीला जाऊन मिळतं. मात्र वर्धा नदीचं पात्र फुगल्याने इरई आणि झरपट नद्यांचं पाणी वर्धा नदीत जात नाही. ते चंद्रपूर शहरात शिरायला सुरुवात झाली आहे. पुराचं हे पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी आपलं सामान स्थानांतरित केली.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.