सोयाबीन, कापूस, तूर पाण्यात; शेकडो विहिरी झाल्या जमीनदोस्त, शेतकऱ्यांपुढं मोठं संकट

सोयाबीन, कापूस, तूर पूर्णतः पाण्यात वाहून गेली. तर 120 विहिरी जमीनदोस्त झाल्यात. यात अनेक मोटार खराब झाल्या आहेत.

सोयाबीन, कापूस, तूर पाण्यात; शेकडो विहिरी झाल्या जमीनदोस्त, शेतकऱ्यांपुढं मोठं संकट
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 3:59 PM

वाशिम : वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने हाहाकार माजवून ठेवला आहे. कारंजा आणि मानोरा तालुक्यातील नदी नाल्यांना मोठे पूर आले होते. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. तर शेकडो हेक्टर शेती खरडून गेली आहे. त्याचबरोबर शेकडो गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. बऱ्याच घरात पाणी शिरलं होत काही घरांची पडझड झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पुराचा ५१ गावांना फटका

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा आणि मानोरा तालुक्यात झालाय. कारंजात 50.8 मिमी तर मानोऱ्यात 64.9 मिमी पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यातील उमरी मंडळात झाला आहे. तिथे 95.8 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 14 घरांची पडझड झाली आहे. दोन जनावरं दगावली आहेत. जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा तालुक्यातील बेंबळा, साखळी, उमा, कापशी, कमळगंगा आणि इतर नदी नाल्याला पूर आल्याने 22 गावांचा संपर्क तुटला होता. तसेच दोन्ही तालुक्यातील 51 गावांना फटका बसला. नदीकाठची जमीन पुरामुळे खरडून गेल्याने हजारो हेक्टरवरील पिकं वाहून गेली आहेत.

घरांचे, शेतीचे नुकसान

मानोरा तालुक्यातील बेलोरा गावाला खोराडी नदीचा तर वरोली आणि कारखेडा, तडप गावाला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता तर पोहरादेवी, गव्हा,धानोरा गाडगे, कोंडोली, सावळी फुलउमरी,वाटोड, नायगाव या गावतही पुराचे पाणी शिरले आहे.या पुरामुळे गावातील घरांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे..

ढगफुटी सदृश्य पाऊस सकाळी सात ते बारावाजतापर्यंत पाच तास पावसाने झोडपून काढले. फुलउमरी, रतनवाडी, सोमेश्वरनगर, उमरी बु, उमरी खुर्द, शेंदोना, आमदरी, शिवणी, हातोली गावातील नाल्या काठचे शेतातील पिके वाहून गेली. अनेक शेतीला तळ्याचे रूप आले होते. सोयाबीन, कापूस, तूर पूर्णतः पाण्यात वाहून गेली. तर, 120 विहिरी जमीनदोस्त झाल्यात. यात अडून अनेक मोटारी खराब झाल्या आहेत, अशी माहिती सरपंच मंगल चव्हाण यांनी दिली.

शेतात कंबरभर पाणी

फुलउमरी येथील निळकंठ राठोड यांच्याकडे 20 एकर शेती आहे. यांच्या शेतात सोयाबीन, कापूस पेरलेले होते. पूर्णतः शेत पाण्याखाली गेलं होतं. कंबरभर पाणी शेतामध्ये साचलं. त्यात अतोनात नुकसान झालं. तसेच शेतातील चार विहिरी खचून गेल्याने आर्थिक संकटात सापडले आहे.

पशुपालन व्यवसायही संकटात

मानोरा तालुक्यातील पाळुदी येथील रामजी राठोड यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. त्या शेतामध्ये शेडनेटमध्ये पशुपालनचा व्यवसाय तसेच शेतामध्ये शेत पिकाचे नुकसान झाले. त्यासोबत विहीर पूर्णतः खचून गेली. शेतकरी रामजी राठोड हे पंचनामे करून भरीव मदत मागील आहेत.

मानोरा तालुक्यातील सावळी, शेंदोना, पोहरादेवी, उमरीसह अनेक ठिकाणच्या शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. शेतकरी हतबल झाला आहे. या शेत नुकसानीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलीय.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.