AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : शेतकऱ्यांनी दमडीही घेतली नाही तरी 113 कोटींचे कर्ज झालं तरी कसं?

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड घ्यायचे. बँकेत खाते खोलायचे आहेत असे सांगून हे सहकारी एकेक शेतकऱ्यांना सदर येथील कॉर्पोरेशन बँकेत आणत. त्याचे खाते खोलून झाल्यावर शेतकऱ्यांना घरी नेऊन सोडत.

Nagpur Crime : शेतकऱ्यांनी दमडीही घेतली नाही तरी 113 कोटींचे कर्ज झालं तरी कसं?
MAHARASHTRA FARMERS CHIT Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 31, 2023 | 9:13 PM
Share

नागपूर : 31 ऑगस्ट 2023 | शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. तर, शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांची लुट केली जात आहे. अशीच एक घटना नागपूरमधील मौदा, पारशिवनी आणि रामटेक परिसरातील शेतकऱ्यांबाबत घडली आहे. कर्ज वसुलीसाठी या शेतकऱ्यांना बँकेने पत्र पाठवले. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. आता या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची दाखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

2017 मध्ये नागपूर जिल्ह्यात मोठा ओला दुष्काळ पडला. त्यामुळे मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. याचा फायदा रमण्णाराव मुसलीया बोल्ला याने घेतला. बोल्ला याची मौद इथे राइस मिल आहे. त्याने मिलवर येणाऱ्या शेतकरी, महिला यांना गोड बोलून सरकारची मदत मिळवून देतो, बँकेतून कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले.

मालक बोल्ला याने आपले काही सहकारी सोबत घेतले. हे सहकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड घ्यायचे. बँकेत खाते खोलायचे आहेत असे सांगून हे सहकारी एकेक शेतकऱ्यांना सदर येथील कॉर्पोरेशन बँकेत आणत. त्याचे खाते खोलून झाल्यावर शेतकऱ्यांना घरी नेऊन सोडत. अशाप्रकारे बोल्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकूण १५१ शेतकऱ्यांची बँकेत खाती खोलली.

रमण्णाराव बोल्ला याने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्या शेतकऱ्यांचे धनादेश घेतले. धान्य गहाण ठेवल्याचा मोबदल्यात बँकेकडून कर्ज देण्यात येते असे सांगून त्याने धनादेशावर त्यांच्या सह्या घेतल्या. मात्र ते धनादेश त्याने स्वतःजवळ ठेवले. काही दिवसांनी बोल्ला याने बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेतले.

रक्कम नाही शिवाय नोटीस, शेतकरी चक्रावले

बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी न करता कर्ज अर्ज मंजूर केले. कर्जाची रक्कम बोल्ला याने अन्य खात्यात जमा केली. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीसाठी नोटीस आली. कर्जाची कोणतही रक्कम मिळाली नाहीच शिवाय नोटीस आल्याने शेतकरी चक्रावले. त्यांनी बोल्ला याला गाठून त्याचा जाब विचारला.

शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

बोल्ला याने तुमच्या कर्जाची रक्कम अन्य कंपनीत गुंतवली आहे. काही दिवसांनी व्याजासह पैसे परत करतो, असे आश्वासन त्याने दिले. मात्र, त्याने शेतकऱ्यांना ना रक्कम दिली ना बँकेत कर्ज जमा केले. अखेर, या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलिसांना निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महासंचालक यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर एसआयटीने बोल्ला आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

18 जणांविरोधात गुन्हा दाखल

विशेष तपास पथकाने रमण्णाराव मुसलिया बोल्ला याच्यासह कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक मन्शुराम पाटील (मृत), एनसीएमएलचे तत्कालीन अधिकारी आणि अन्य विविध 12 कंपन्यांचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला. नागपूर जिल्ह्यातील 151 शेतकऱ्यांची 113 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.