AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊर्जा विभागाच्या चौकशीसाठी सर्व यंत्रणा कामाला लावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान

नागपूर : फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या 6500 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होणार आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून 15 दिवसांत चौकशी करावी, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागातील बरीच कामे झाली. त्यापैकी 6500 कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे. पण या चौकशीला 2 वर्षे […]

ऊर्जा विभागाच्या चौकशीसाठी सर्व यंत्रणा कामाला लावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 3:10 PM
Share

नागपूर : फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या 6500 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होणार आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून 15 दिवसांत चौकशी करावी, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागातील बरीच कामे झाली. त्यापैकी 6500 कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे. पण या चौकशीला 2 वर्षे का लावले, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. आताही एक महिना नाही तर सर्व यंत्रणा वापरून त्वरित चौकशी करावी, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत. म्हणून ही चौकशी केली जाते. फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कौतुक केले होते. आता त्याच कामाची चौकशी करत आहेत. पण यातून काहीही निघणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

चौकशी करण्याची धमक नाही

ही चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं उशीर का केला, असा प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. आता चौकशीचा अहवाल जनतेसमोर आणला पाहिजे. खरे म्हणजे महाविकासआघाडीतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे सरकारमधील काहींनी आता चौकशी करतो, अशी भीती दाखविणे सुरू केले. विरोधी पक्षावर दबाव बनविण्याकरिता हे सारे सुरू आहे. खरं म्हणजे चौकशी करण्याची धमक या सरकारमध्ये नाही, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारकडे काहीच कामे नसल्याने ओरड

चौकशीसाठी पोलीस, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दक्षता विभाग या सर्वांना कामाला लावावे. त्यामुळं 1 डिसेंबरपूर्वी चौकशी होईल. खरं तर फडणवीस सरकारमधील ऊर्जा खात्याचा परफार्मन्स एक नंबरचा होता. हे राज्याची जनता सांगेल. यापूर्वी फडणवीस सरकारमधील जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी झाली. त्यातून काहीच बाहेर आले नाही. ऊर्जा विभाागाच्या चौकशीचेही हेच होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावेळीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे की, फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जाखात्याची कामे सर्वोत्कृष्ट झाली. आता त्यांच्याकडे काहीच कामे नसल्याने अशी ओरड सुरू आहे. पण, त्यातून काहीही बाहेर येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

इतर संबंधित बातम्या :

VIDEO: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले, मंत्रालयावर धडकण्याआधीच सोमय्या, पडळकरांची धरपकड; आंदोलक संतापले

माझ्यावरील गुन्हे राजकीय, भाजपचे मुन्ना यादव यांचे स्पष्टीकरण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.