AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

उत्तर प्रदेशप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 5:13 PM
Share

नागपूर : उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपुरात बोलत होते. उत्तर प्रदेशात आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची तयारी तेथील राज्य सरकारने केली आहे. या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या राज्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या राज्यात हा कायदा आणणे आवश्यक आहे. सोबतच गरज पडल्यास देशातही हा कायदा आणणे आवश्यक आहे. (like Uttar Pradesh India should bring in a population control law; Devendra Fadnavis Demands)

फडणवीस म्हणाले की, गरज पडल्यास देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक आहे, परंतु बळजबरी न करता हा कायदा आणावा. कारण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. नागपूरच्या प्रगतीत आपले महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच आपल्या कार्यकर्तुत्वाने नागपूरचे नाव देशभरात गजवणाऱ्या विविध व्यक्तिंच्या पुतळ्यांचे आणि शिलान्यासाचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मौलाना अब्दुल करीम पारेख, पद्मश्री डॉ. बी. एस. चौबे, लोकनायक बापूजी अणे, विदर्भवीर खा. जांबुवंतराव धोटे, ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यां सुमतीताई सुकळीकर, महान कवी ग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन अशा 8 हिरोज ऑफ नागपूरचा यात समावेश आहे. हे सर्व पुतळे आणि शिलान्यास शहरातील मुख्य परिसरातील सिव्हिल लाइन्स येथे रस्त्याचा कडेला उभारण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांची नागपूर मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (10 जुलै) भाजपने नागपुरातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना निवडणुकीचा कानमंत्र दिला.

नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचीही भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. दरम्यान, आम्ही नागपूर मनपा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

इतर बातम्या

भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका

निवडणुका लागेपर्यंत केंद्राने ओबीसी समाजाचा इम्पेरीकल डेटा गोळा करावा; शिवसेनेची मागणी

(like Uttar Pradesh India should bring in a population control law; Devendra Fadnavis Demands)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.