अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आम्ही कसं जगायचं? शेतकऱ्यांचा सवाल

रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. नागपूर विभागात 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत करण्यात आलाय.

अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आम्ही कसं जगायचं? शेतकऱ्यांचा सवाल
शेतकरी
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 2:33 PM

नागपूर: रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. नागपूर विभागात 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत करण्यात आलाय. सिंचनासाठी वीज नसल्याने नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संकटात आले आहेत. अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालीय. बुटीबोरी परिसरात 500 च्या वर शेतीपंपाची वीज खंडीत केली गेलीय. त्यामुळं खरिपात गहू, चणा कसा पेरायचा? कुटुंब जगवायचं कसं? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला केलाय.

राज्यात अतिवृष्टी झाली, पिकांचं मोठं नुकसान झालं. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी हंगामात मोठी आशा होती. पण, महावितरणच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामंही धोक्यात जाण्याची शक्यता आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय. महावितरणने नागपूर विभागात 10 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत केलीय, त्यामुळे आता रब्बी पेरणीसाठी शेती तयार आहे, पण सिंचनासाठी वीज नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडलेत.

कुटुंब कसं जगवायचं?

अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय. गहू, चणा कसा पेरायचा? कुटुंब जगवायचं कसं? लेकराबाळांचं पोट कसं भरायचं? की आत्महत्या करायची? संतप्त शेतकऱ्यांचा हा सरकारला सवाल आहे.

किमान दिवाळीपर्यंत थांबायला हवं होतं

खूप मोठं संकट आणि खूप मोठ या दिवाळीच्या तोंडावर आलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न मिळालं नाही.शेतकऱ्यांची वीज कापलीय. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पेरणी कशी करावी, असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय.

इतर बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह

Mahadiscom cut ten thousand farmers electricity connection on the time of rabbi season