AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Pollution | महाजनकोच्या प्रदूषणाची नितीन गडकरींकडून दखल; व्यवस्थापकीय संचालकांना लिहिले पत्र

लीना बुद्धे यांच्या सादर केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालाची दखल गडकरी यांनी घेतली. सीएफएसडी आणि असर यांनी अभ्यासानंतर तयार केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालानंतर गडकरींनी संबंधितांना पत्र लिहिलंय.

Nagpur Pollution | महाजनकोच्या प्रदूषणाची नितीन गडकरींकडून दखल; व्यवस्थापकीय संचालकांना लिहिले पत्र
कोराडी परिसरातील प्रदूषित भाग
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 2:43 PM
Share

नागपूर : महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून (Nitin Gadkari) दखल घेण्यात आली. नितीन गडकरी यांनी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) संजय खंदारे यांना यासंदर्भात पत्र लिहिले. कोराडी, खापरखेडा वीज प्रकल्पातील फ्लाय अ‍ॅश प्रक्रियेत पर्यावरणीय नियमांची पूर्तता केली गेली नाही. याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे गडकरी यांनी निर्देश दिलेत. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या (Center for Sustainable Development) लीना बुद्धे यांच्या सादर केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालाची दखल गडकरी यांनी घेतली. सीएफएसडी आणि असर यांनी अभ्यासानंतर तयार केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालानंतर गडकरींनी संबंधितांना पत्र लिहिलंय.

जमीन राखेमुळं प्रदूषित

कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रामुळं या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय. या प्रदूषणाचा काय परिणाम झाला, याचा अभ्यास सीएफएसी आणि असर या सामाजिक संस्थांनी केला होता. तेव्हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. या परिसरातील पाणी दूषित झालंय. जनावरसुद्धा असं दूषित पाणी पिण्यास मागेपुढं पाहतात. जमिनीची सुपिकता नष्ट झाली. आधी पिके व्हायची. आता जमीन राखेमुळं प्रदूषित झाली. त्यामुळे पिके काढणे शक्य नाही. जी झाडे लावली जातात, ती राखेखाली दडपली जातात. त्या झाडांची वाढ होत नाही.

हवा, पाणीही दूषित

दूषित घटक हवेत मिसळल्यानं हवेचा दर्जा घसरला. हवेत कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढलं. श्वास घेण्यास त्रात होत आहे. नागरिकांना श्वसनाशी संबंधित आजार झाले आहेत. विहिरींमधील पाणी दूषित झालंय. ते पिण्यायोग्य राहीलं नाही. या साऱ्या समस्या निर्माण झाल्यामुळं सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. या संदर्भात आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बैठक बोलाविली होती. प्रदूषित गावांचं करायचं काय, असा प्रश्न निर्माण झालाय. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपाय शोधून काढणार आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.