AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावित्रीबाईंचा उल्लेख केला तो महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला आवडलेला नाही; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा घेतला समाचार..

सध्याच्या काळात चित्रपट, साहित्य, संस्कृतीनिमित्ताने होणारे विरोध आणि त्यावरून झालेल्या वादावर बोलतानाही त्यांनी जुन्या आणि नव्या काळाचा संदर्भ सांगितला.

सावित्रीबाईंचा उल्लेख केला तो महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला आवडलेला नाही; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा घेतला समाचार..
| Edited By: | Updated on: Jan 04, 2023 | 12:30 AM
Share

कर्जतः माझं शिक्षण मुंबईसारख्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी कधी जात, धर्म कधीच आड आले नाही, तसच माझ्या घरातही आणि माझं लग्न झाल्यानंतरही माझ्या जातीचा आणि धर्माचा कधी उल्लेख मला करावा लागला नाही. अशा घरात माझा जन्म झाल्यामुळेच मला माझं मत मांडण्याचा अधिकार मिळत गेला असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोलताना त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या बदलाबद्दलही आपले मत व्यक्त केले.

सध्याच्या काळात चित्रपट, साहित्य, संस्कृतीनिमित्ताने होणारे विरोध आणि त्यावरून झालेल्या वादावर बोलतानाही त्यांनी जुन्या आणि नव्या काळाचा संदर्भ सांगितला.

जब्बार पटेल, विजय तेंडुलकर यांनी ज्या प्रकारे साहित्यनिर्मिती, चित्रपटनिर्मिती झाली ती आजच्या काळात जर केली असती तर लोकांसमोर आली असती का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सध्याच्या काळात ज्या ज्या गोष्टीवरून वाद चालू आहे. त्या त्या गोष्टींवरून निर्माण झालेले वाद त्या त्या काळात का निर्माण झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांविरोधात चित्रपट असतानाही मंत्रालय परिसरात चित्रपट निर्मिती झाली, सह्याद्री बंगल्यावरही चित्रीकरण करण्यात आले.

कारण त्या काळात सगळ्यांकडे एक प्रगल्भता होती असंही त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी रोहित पवार, आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याविषयी आणि त्यांच्या मांडणीविषयीही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेले मत हे इतिहासाच्या आधारावर त्यांनी कसं मांडले आहे यावर त्यांनी नव्या राजकीय नेत्यांची भूमिका मांडलेली दिसून आली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...