AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बेळगाव तर येईलच पण म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा”; राष्ट्रवादीनं सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला

आमदार छगन भुजबळ यांनी थेट मुंबई राज्य होतं त्यावेळेपासूनचा इतिहास मांडत त्या मुंबई प्रांतामध्ये ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताचा भाग होता त्याप्रमाणे म्हैसूर प्रांतही आता महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेळगाव तर येईलच पण म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा; राष्ट्रवादीनं सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 28, 2022 | 4:59 PM
Share

नागपूरः सीमाप्रश्नावर वेळोवेळी झालेल्या आंदोलनात आणि थेट बेळगावमध्ये येऊन ज्यांनी आंदोलन केले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी सीमाप्रश्नाचा सगळा इतिहास सांगितला. मुंबई राज्य अशी रचना होती, तेव्हा पासून ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताची रचना होती. त्या रचनेनुसारच जर बघायचं झालं तर म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे सीमावाद आता आणखी चिघळणार का असा सवार आता उपस्थित होऊ लागला आहे.

कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारने एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव पास केला होता, त्याला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक विरोधात ठराव मांडला.

महाराष्ट्र सरकारने ठराव पास केल्यानंतर महाराष्ट्राचा हा ठराव मिळमिळीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली होती.

त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी सीमावादाचा थेट संबंध मुंबई प्रांत असं राज्य होते, त्यानुसार सीमाप्रश्नाचा संबंध जोडला आहे. त्याचमुळे छगन भुजबळ यांनी सांगितले की, पूर्वी मुंबई राज्य होतं, त्यामध्ये म्हैसूर प्रांत होता.

त्यामुळे आता थेट म्हैसूर प्रांतावरच छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. त्यामुळे बेळगावसह म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आता सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला आहे.

त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे आता कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया व्यक्त होते त्याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कानडी भाषिक राहत असल्याने मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

त्यामुळेच आमदार छगन भुजबळ यांनी थेट मुंबई राज्य होतं त्यावेळेपासूनचा इतिहास मांडत त्या मुंबई प्रांतामध्ये ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताचा भाग होता त्याप्रमाणे म्हैसूर प्रांतही आता महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड