AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बेळगाव तर येईलच पण म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा”; राष्ट्रवादीनं सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला

आमदार छगन भुजबळ यांनी थेट मुंबई राज्य होतं त्यावेळेपासूनचा इतिहास मांडत त्या मुंबई प्रांतामध्ये ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताचा भाग होता त्याप्रमाणे म्हैसूर प्रांतही आता महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेळगाव तर येईलच पण म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा; राष्ट्रवादीनं सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 28, 2022 | 4:59 PM
Share

नागपूरः सीमाप्रश्नावर वेळोवेळी झालेल्या आंदोलनात आणि थेट बेळगावमध्ये येऊन ज्यांनी आंदोलन केले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी सीमाप्रश्नाचा सगळा इतिहास सांगितला. मुंबई राज्य अशी रचना होती, तेव्हा पासून ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताची रचना होती. त्या रचनेनुसारच जर बघायचं झालं तर म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे सीमावाद आता आणखी चिघळणार का असा सवार आता उपस्थित होऊ लागला आहे.

कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारने एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव पास केला होता, त्याला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक विरोधात ठराव मांडला.

महाराष्ट्र सरकारने ठराव पास केल्यानंतर महाराष्ट्राचा हा ठराव मिळमिळीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली होती.

त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी सीमावादाचा थेट संबंध मुंबई प्रांत असं राज्य होते, त्यानुसार सीमाप्रश्नाचा संबंध जोडला आहे. त्याचमुळे छगन भुजबळ यांनी सांगितले की, पूर्वी मुंबई राज्य होतं, त्यामध्ये म्हैसूर प्रांत होता.

त्यामुळे आता थेट म्हैसूर प्रांतावरच छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. त्यामुळे बेळगावसह म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आता सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला आहे.

त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे आता कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया व्यक्त होते त्याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कानडी भाषिक राहत असल्याने मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

त्यामुळेच आमदार छगन भुजबळ यांनी थेट मुंबई राज्य होतं त्यावेळेपासूनचा इतिहास मांडत त्या मुंबई प्रांतामध्ये ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताचा भाग होता त्याप्रमाणे म्हैसूर प्रांतही आता महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?