AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्हा परिषदेत ‘ॲापरेशन कमळ’ची तयारी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजप सुरुंग लावणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडलेत. लवकरच नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट होईल, असा दावा खुद्द भाजपचे विरोधीपक्ष नेते आतिश उमरे यांनी केलाय.

नागपूर जिल्हा परिषदेत ‘ॲापरेशन कमळ’ची तयारी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजप सुरुंग लावणार?
| Edited By: | Updated on: Jul 22, 2023 | 3:52 PM
Share

नागपूर : महाविकास आघाडीची सत्तापालट करण्यासाठी महाराष्ट्रात ‘ॲापरेशन लोटस’ राबवण्यात आलं. “काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेतही ‘ॲापरेशन लोटस’ राबवलं जाणार आहे. खुद्द नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधीपक्ष नेते सतीश उमरे यांनी हा दावा केलाय. जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नाराज सदस्यांचा गट भाजपच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडलेत. लवकरच नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट होईल, असा दावा खुद्द भाजपचे विरोधीपक्ष नेते आतिश उमरे यांनी केलाय.

काँग्रेसमधील काही पदाधिकारी नाराज

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांचं वर्चस्व आहे. त्यांचाच गट सध्या सत्तेत आहे. पण त्यांच्या गटातंही पदाधिकाऱ्यांवरील नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्येही भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जातेय.

झेडपीमध्ये होणार ऑपरेशन लोटस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील, जिल्हा परिषदेत काँग्रेस ‘ॲापरेशन लोटस’ यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

भाजपला १५ सदस्यांची गरज

नागपूर जिल्हा परिषदेतील एकूण ५८ सदस्यांपैकी काँग्रेसचे ३२, तर १४ भाजपचे, राष्ट्रवादीचे ८ सदस्य आहेत. शिवसेना (शिंदे गट), शेकाप, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष असे चार सदस्य आहेत. भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी १५ सदस्य आवश्यकता आहे. त्यासाठी ‘ॲापरेशन लोटस’ची तयारी सुरु झालीय.

सुनील केदार यांनी संघटन मजबूत करून जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणली. नागपूर जिल्ह्यात भाजपचे दिग्गज आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तरीही जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे भाजप ऑपरेशन लोटस करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.