AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच पक्ष प्रवेशाचा मोठा भूकंप राज्यात होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं

राज ठाकरे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही.

लवकरच पक्ष प्रवेशाचा मोठा भूकंप राज्यात होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 10, 2023 | 12:58 PM
Share

नागपूर : सामनाला अर्थसंकल्प कळतो का. सामनामध्ये लिहिणाऱ्या कधी निवडणुका लढल्या आहेत का? असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उत्कृष्ट अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. विदर्भाला शिल्लक निधी मिळाला. मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पाला निधी मिळाला. विदर्भाचे सुपुत्र म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. महाविकास आघाडीने विदर्भाला सापत्न वागणूक दिली. विदर्भातील क्रीडा मंत्री असताना निधी मिळत नव्हता. आता 100 कोटी रुपये नागपूर विभागीय क्रीडा संकुलला मिळाले. संताची भूमी असल्याने तीर्थक्षेत्राला मोठा निधी मिळाला.

14 तारखेला मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. पक्ष प्रवेशाचे मोठे भूकंप राज्यात बसणार आहे. आमचे सरकार बोलायची कढी नाही, तोंडचे वाफे आम्ही काढत नाही. असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना 24 तास वीज आणि पाणी मिळेल, यासाठी तरतूद बजेटमध्ये आहे. 2024-25 चा अर्थसंकल्प यापेक्षा चांगला असेल. असं कुठलच क्षेत्र नाही ज्यासाठी बजेटमध्ये तरतूद नाही. शिवाजी महाराजांच्या काळातील नीतीचे दाखले यात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या बजेटमधून दिसत आहेत. रोजगार निर्मिती करणारा बजेट आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव नाही

राज ठाकरे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही. बजेट सुरू असताना विरोधी पक्षाच्या आमदारांचे चेहरे छोटे झाले होते. त्यांना पश्चाताप होत असल्याचं दिसत होतं. महायुतीने सत्तेपासून पैसा, पैशातून सत्ता हेच ध्येय होतं. पण हे सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदाराला देखील असं वाटत आहे.

एससी, एसटीकरिता ज्या सवलती असतील त्यासाठी ते पर्याय पाहिले जात असतील. पण ही सवलत इतर समाजाला देखील मिळणे आवश्यक आहे. मी याची अजून माहिती घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं. उध्दव ठाकरे गट प्रत्येक तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन करणार ते फुसका बार ठरणार आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांना काही दिलं नाही आणि आता आंदोलन करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शिंदे-फडणवीस जोडी धनाजी संताजीची जोडी

शिंदे-फडणवीस जोडी धनाजी संताजीची जोडी आहे. दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत काम करण्याचे आमचे संस्कार आहेत. उध्दव ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले त्यांनी आम्हाला सांगू नये. अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागल्या सरकारपेक्षा आमचं सरकार दुपटीने मदत करेल, असं आश्वासनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.