AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

बहुजनांचा प्रश्न मांडून शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुले यांनी या नाटकात अधोरेखित केले. सामाजिक परिवर्तनाचा उद्देश समोर ठेवून त्यांनी हे नाटक रचले आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक मराठी रंगभूमीचे जनक ठरतात, असं मत लोकजागृती संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केले.

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग
तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रातImage Credit source: tv 9
| Updated on: Apr 08, 2022 | 5:00 AM
Share

नागपूर : समग्र सामाजिक क्रांतीचे अग्रदुत क्रांतिसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule) यांच्या लेखणीतून साकारलेले तृतीय रत्न (Tritiya Ratna) नाटक नाट्यसृष्टीच्या आजपर्यंतच्या इतिहासात रंगमंचावर आणण्याचे धाडस करण्यात आले. हे धाडस परिवर्तनाच्या प्रबोधन चळवळीत सदैव सक्रिय असलेले सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे. महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटक प्रथमच अनिरुद्ध वनकरांच्या निर्मितीत व दिग्दर्शनामध्ये 10 एप्रिलपासून पुणे येथे पहिला प्रयोग सादर होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सादरीकरणाला सुरुवात होत आहे. 1855 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला असता ते त्यावेळी सादर होऊ देण्यात आले नाही. त्यानंतर प्रथमच  हे नाटक सादर केले जाणार आहे. अशी माहिती अभिनेते व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर (Aniruddha Vankar) यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसांपासून तालीम

तृतीय रत्न नाटकाची नागपूर येथे मागील 15 दिवसांपासून जोरदार तालीम सुरू आहे. या नाटकाची निर्मिती चंद्रपूरच्या लोकजागृती या संस्थेची आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अनिरुद्ध वनकर, प्रा. डॉ. शेखर डोंगरे, संजीव रामटेके, मंगेश मेश्राम, नागसेन गायकवाड, अरविंद खंदारे, रूपेश मेश्राम, आकाश डांगे, चंद्रकांत तोरणे, करण गुडेवार, अविनाश बोना, अभिनेत्री दीपाली बडेकर, शुभांगी राऊत, रूपाली खोब्रागडे, रंजू वैद्य यांच्यासह इतरही कलावंत नाटकात भूमिका साकारणार आहेत. सेट, कास्ट्यूम व  क्रिएटिव्ह हेड म्हणून  प्रा. संगीता टिपले संपूर्ण जबाबदारी पार पडणार आहेत. प्रकाश योजना प्रा. शिवप्रसाद गौड नई दिल्ली यांचे असणार आहे.

सामाजिक परिवर्तनाचा उद्देश

नाटक म्हणजे मनोरंजन, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात असले तरी महात्मा ज्योतिबा फुले यांचा काळ आणि तेव्हाचे समाजमन लक्षात घेता नाटकातून होणाऱ्या प्रबोधनाला महत्त्व होते. वैचारिक व सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रबोधनाची कास धरत समाजाच्या अंतर्मनात पोहोचण्यासाठी त्यांनी तृतीय रत्न हे नाटक बांधले. याच नाटकाने सामाजिक रंगभूमीचा पाया रचला असे म्हटले जाते. महात्मा फुले यांची वैचारिक दृष्टी या नाटकात कलात्मकदृष्ट्या व्यक्त होते. कलेचा कृतिपूर्ण उद्देश या नाटकातून दिसून येतो.

Nagpur | स्वच्छ भारत अभियान; नागपुरात ओल्या कचऱ्याची जागीच प्रक्रिया स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

Video Chhagan Bhujbal on ED | ईडी हा राक्षसी कायदा, अकोल्यात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली चिंता

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.