AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात डोळा मारणारे दोन जण झालेत; खासदार अनिल बोंडे यांनी दोघांचंही नाव सांगितलं

उद्धव साहेब बोलतील, असं म्हणून अजित पवार बाजूला झाले. त्यानंतर त्यांनी एक कार्यकर्त्याकडं पाहून डोळा मारला होता. यावर बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले,..

देशात डोळा मारणारे दोन जण झालेत; खासदार अनिल बोंडे यांनी दोघांचंही नाव सांगितलं
खासदार अनिल बोंडे
| Edited By: | Updated on: Mar 12, 2023 | 1:59 PM
Share

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे अर्थसंकल्पावर बोलत असताना उद्धव ठाकरे आले. त्यावेळी उद्धव साहेब बोलतील, असं म्हणून अजित पवार बाजूला झाले. त्यानंतर त्यांनी एक कार्यकर्त्याकडं पाहून डोळा मारला होता. यावर बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, विरोधकांनासुद्धा या बजेटबद्दल चांगलं बोलावं लागलं. अजितदादा यांना डोळा मारावं लागला. देशात आता डोळा मारणारे दोन जण झालेत. एक अजितदादा आणि दुसरे राहुल गांधी. अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार डोळा मारतात. एवढा अपमान झाला आणि शिवसैनिकाना काहीच वाटले नाही. मी पण शिवसैनिक होतो, असं भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितलं.

उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

अनिल बोंडे म्हणाले, अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते. तेव्हा महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना काहीच दिलं नव्हतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने मागच्या वेळी NDRF च्या नियमांपेक्षा जास्त मदत केली. आतासुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाई देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या होत आहेत, हे थांबविण्यासाठी त्यांचं उत्पादन वाढविण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केला. त्याला यश येत आहे.

हे कुठल्याच राज्यात झालं नाही

अजित पवार शेतकऱ्यांना 6 हजार देणार असल्यावर अनिल बोंडे म्हणाले की, घरात 4 लोक असतील तर त्याची रोजी 3 रुपये होणार हा शेतकऱ्यांचा अपमान नाही का ? मात्र यांनी सरकार असताना शेतकऱ्यांना दमडी तरी दिली का ? असा प्रश्न आहे. कोरोना आणि महाविकास आघाडीचा काळ महाराष्ट्राला लुस्त करून टाकणारा होता. मात्र आता अर्थमंत्री यांनी मांडलेला अर्थसंकल्प सगळ्यांना सुख देणारा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे. 40 हजार लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडला. शेतकऱ्यांसाठी नमो किसान निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. एक रुपयात नोंदणी करा. तुमचे विम्याचे हफ्ते सरकार भरणार हे कुठल्याच राज्यात झालं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मदत झाली नाही.

नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचं महाविकास आघाडीने कबुल केलं होतं. मात्र दिले नाही. आता आमच्या सरकारने ते पुन्हा सुरू केलं. प्राकृतिक शेतीला सरकारने महत्व दिले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांना विरोधात सुद्धा बोलता येत नाही. म्हणून ते आता म्हणतात शेतकऱ्याचं वीज बिल वाढणार. मात्र तसं नाही, आता सोलर ऊर्जा वाढविली जात आहे, असंही अनिल बोंडे यांनी म्हंटलं.

Follow Us
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...