AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात पावसाआधीच शेतकऱ्यांची धांदल; नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गडबड करू नका; कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा हजारपेक्षा अधिक हेक्टर सोयाबीनचे पेरणी केली जात असते. सोयाबीन पेरणीसाठी स्व: उत्पादीत चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावेत. पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लांटरचा वापर करावा.

विदर्भात पावसाआधीच शेतकऱ्यांची धांदल; नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गडबड करू नका; कृषी विभागाचे आवाहन
कापूस पीक
| Updated on: Jun 09, 2022 | 4:17 PM
Share

नागपूरः विदर्भात मान्सून (Vidharbh Monsoon) दाखल होण्यास अजून वेळ असला तरी शेतकऱ्यांची मात्र बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी उद्योग दुकानात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे बियाने खरेदीला (Seed purchase) सुरुवात झाली, त्यावरून यावर्षी विदर्भात कापसाचा पेरा (Cotton seeds) वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाला होता, त्यामुळे शेतकरी कापसाकडे वळताना दिसत आहे. विदर्भ हा कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मात्र मागील काही वर्षात कापसाला मिळत असलेला कमी भाव आणि त्यासाठी लागणारा खर्च बघता शेतकऱ्यांच्या जास्त नुकसानच येत आहे.

त्यामुळे शेतकरी कापसापासून दूर जाताना दिसून येत होता, मात्र यावर्षी ज्या प्रमाणे खरेदी होत आहे त्यावरुन तरी असे दिसून येते की विदर्भात कापसाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी घाई करू नये

नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणी करण्यास सुरुवात करत आहे. मात्र जोपर्यंत पाऊस 75 ते 100 मि.मि झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा हजारपेक्षा अधिक हेक्टर सोयाबीनचे पेरणी केली जात असते. सोयाबीन पेरणीसाठी स्व: उत्पादीत चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावेत. पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लांटरचा वापर करावा.

कृषी विभागाकडून आवाहन

सोयाबिनची उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर बियाण्याची 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.