AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल

खाते वाटपावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल
| Updated on: Dec 22, 2024 | 3:34 PM
Share

शनिवारी मंत्र्यांना खात्याचं वाटप झालं, यावर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार कौरवा सारखं वागत असून आपसात लढून यांचा कार्यक्रम संपणार आहे. मलाईदार जिल्हा आणि मलाईदार खात्यासाठी याची लढाई चालली आहे. जनतेच्या प्रश्नांचं यांना काही देणं-घेणं नाही. आता पालकमंत्रिपदासाठी सुद्धा यांच्यामध्ये भांडण होणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंमत असेल तर मारकडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून या सरकारने मॉकपोलिंग घेतलं पाहिजे. जनतेचं मत चोरून हे सरकार आलं आहे. निवडणूक आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं त्यावरून असं वाटतं दाल मे कूच काला है, असा घणाघात नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. या टीकेला देखील यावेळी पटोले यांनी उत्तर दिलं आहे.  नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दाचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे. जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करून, गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतं असं पटोले यांनी म्हटलं आहे.

मागील वेळेस 20 हजार कोटींचं बजेट अजित पवार यांनी मांडलं होतं. येणारं बजेट आणखी किती तुटीचं असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पडून महागाई वाढणार आहे. हे निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात आले आहेत. जनतेच्या कृपेने आलेले नाहीत.   महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? असा सवालही यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळ असो की वागणं दोन्ही संवेदनाहीन आहेत, या सरकारला संवेदना नाहीत असंही यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.