AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये तहसील कार्यालयात रहस्यमयी दरवाजा, अनेक वर्षांपासून बंद, राज्यात चर्चेचा विषय!

नांदेडमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे किनवटमधील तहसील कार्यालयाचा पश्चिमेतील दरवाजा चर्चेत आला आहे. अंधश्रद्धेमुळे हा दरवाजा बंद असल्याचे बोलले जात आहे.

नांदेडमध्ये तहसील कार्यालयात रहस्यमयी दरवाजा, अनेक वर्षांपासून बंद, राज्यात चर्चेचा विषय!
nanded closed doorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 9:06 PM
Share

तंत्र-मंत्र आणि अघोरी विद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा राज्यात चर्चेचा विषय आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यात राजकारण पेटले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य करून त्याने अनेक गंभीर कांड केले आहेत. दरम्यान, एकीकडे अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत असताना आता दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालय चर्चेत आले आहे. या तहसील कार्यालयाच्या एका दरवाजाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्या भागातील लोक या दरवाजाबाबत एक गंभीर दावा करत असून प्रशासन मात्र वेगळंच काहीतरी सांगत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालयातील एक दरवाजा नेहमीच बंद असतो. याच दरवाजामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक लोक तसेच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार तहसील कार्यालयाची इमारत जेव्हापासून तयार झालेली आहे, तेव्हापासून हा दरवाजा अंधश्रद्धेमुळे बंदच ठेवण्यात आला आहे. तहसील कार्यालयातील हा पश्चिमेकडील दरावाजा आहे.

अंधश्रद्धेमुळेच दरवाजा बंद

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रमेश कदम यांनी या दरवाजाबाबत सविस्तर सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपर्वी किनवट तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यात आली होती. परंतु ही इमारत जेव्हापासून उभारण्यात आली, तेव्हापासून पश्चिमी भागातील हा दरवाजा बंदच आहे. कदम यांच्या दाव्यानुसार अंधश्रद्धेमुळेच हा दरवाजा बंद आहे. एका अधिकाऱ्याने हा दरवाजा बंद ठेवण्यााच आदेश दिलेला आहे. परंतु या आदेशामुळे लोकांची खूपच अडचण होत आहे. तहसील कार्यालयात दाखल व्हायचे असल्यास पूर्वेकडील दरवाजातून जावे लागते. त्यासाठी लोकांना लोकांना बरेच अंतर पायी चालावे लागते, असे रमेश कदम यांनी सांगितले.

प्रशासनाचे नेमके मत काय?

दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाने अंधश्रद्धेचा आरोप फेटाळून लावला आहे. पश्चिमेतील दरवाजा हा इमारताचे मुख्य प्रवेशद्वार नाही. जो दरवाजा बंद आहे, त्याच्या बाजूलाच महिलांसाठीचे प्रसाधनगृह आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही तो दरवाजा बंद ठेवला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर