AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये तहसील कार्यालयात रहस्यमयी दरवाजा, अनेक वर्षांपासून बंद, राज्यात चर्चेचा विषय!

नांदेडमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे किनवटमधील तहसील कार्यालयाचा पश्चिमेतील दरवाजा चर्चेत आला आहे. अंधश्रद्धेमुळे हा दरवाजा बंद असल्याचे बोलले जात आहे.

नांदेडमध्ये तहसील कार्यालयात रहस्यमयी दरवाजा, अनेक वर्षांपासून बंद, राज्यात चर्चेचा विषय!
nanded closed doorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 9:06 PM
Share

तंत्र-मंत्र आणि अघोरी विद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा राज्यात चर्चेचा विषय आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यात राजकारण पेटले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य करून त्याने अनेक गंभीर कांड केले आहेत. दरम्यान, एकीकडे अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत असताना आता दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालय चर्चेत आले आहे. या तहसील कार्यालयाच्या एका दरवाजाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्या भागातील लोक या दरवाजाबाबत एक गंभीर दावा करत असून प्रशासन मात्र वेगळंच काहीतरी सांगत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालयातील एक दरवाजा नेहमीच बंद असतो. याच दरवाजामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक लोक तसेच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार तहसील कार्यालयाची इमारत जेव्हापासून तयार झालेली आहे, तेव्हापासून हा दरवाजा अंधश्रद्धेमुळे बंदच ठेवण्यात आला आहे. तहसील कार्यालयातील हा पश्चिमेकडील दरावाजा आहे.

अंधश्रद्धेमुळेच दरवाजा बंद

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रमेश कदम यांनी या दरवाजाबाबत सविस्तर सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपर्वी किनवट तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यात आली होती. परंतु ही इमारत जेव्हापासून उभारण्यात आली, तेव्हापासून पश्चिमी भागातील हा दरवाजा बंदच आहे. कदम यांच्या दाव्यानुसार अंधश्रद्धेमुळेच हा दरवाजा बंद आहे. एका अधिकाऱ्याने हा दरवाजा बंद ठेवण्यााच आदेश दिलेला आहे. परंतु या आदेशामुळे लोकांची खूपच अडचण होत आहे. तहसील कार्यालयात दाखल व्हायचे असल्यास पूर्वेकडील दरवाजातून जावे लागते. त्यासाठी लोकांना लोकांना बरेच अंतर पायी चालावे लागते, असे रमेश कदम यांनी सांगितले.

प्रशासनाचे नेमके मत काय?

दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाने अंधश्रद्धेचा आरोप फेटाळून लावला आहे. पश्चिमेतील दरवाजा हा इमारताचे मुख्य प्रवेशद्वार नाही. जो दरवाजा बंद आहे, त्याच्या बाजूलाच महिलांसाठीचे प्रसाधनगृह आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही तो दरवाजा बंद ठेवला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.