AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | ….तर आमदारकी सोडेन! आमदार Prashant Bamb यांचं बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना ओपन चॅलेंज!

आमदार प्रशांत बंब यांनी 2018 आणि 2019 सालातील बांधकाम विभागाच्या विविध कामांची तक्रार केली होती. त्यापैकी डांबर न वापरताच बिले जोडणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इतर रस्त्याच्या भ्रष्टाचारा प्रकरणी अद्याप काहीही कारवाई झाली नाही.

Nanded | ....तर आमदारकी सोडेन! आमदार Prashant Bamb यांचं बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना ओपन चॅलेंज!
आमदार प्रशांत बंब यांचं मंत्री अशोक चव्हाणांना आव्हानImage Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 11, 2022 | 3:42 PM
Share

नांदेड : राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड जिल्ह्यातच बांधकाम खात्यात प्रचंड भ्रष्टाचार माजलाय. अशोक चव्हाण यांनी आपल्या मतदार संघातील एकही 100 मीटरचा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केल्याचे दाखवले तर मी आदरकी सोडेन. एवढंच काय कर आयुष्यात पुन्हा राजकारण (Politics) करणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) यांनी दिला आहे. प्रशांत बंब हे औरंगाबादमधील गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी नांदेडमधील काही रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. या भ्रष्टाचारावरून त्यांनी अशोक चव्हाण यांना आज थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले आमदार प्रशांत बंब?

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना इशारा देताना आमदार प्रशांत बंब म्हणाले, ‘माझं आव्हान आहे मंत्री महोदयांना. नांदेड जिल्ह्यातील कोणतेही दहा रस्ते त्यांनी निवडावेत. अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवावं. या रस्त्यांमध्ये 50 टक्के निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत. संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील कोणताही रस्ता 100 टक्के क्वालिटीचा असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन जीवनात राजकारण करणार नाही.’

काय आहे नेमकं प्रकरण?

बांधकाम खात्यातील विविध तक्रारीचे पुरावे देण्यासाठी आमदार प्रशांत बंब आज नांदेडला आले होते. नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येऊन बंब यांनी कागदपत्रे सादर केली. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यानी बंब यांचा जवाब देखील नोंदवला. गेल्या चार वर्षांपासून बंब हे बांधकाम खात्यातील अनेक तक्रारीचा पाठपुरावा करत आहेत. त्याच अनुषंगाने एसीबीने बंब यांना त्यांच्याकडचे पुरावे सादर करण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे आमदार बंब हे आज नांदेडला येऊन त्यांनी एसीबी कार्यालयात पुरावे सादर केली . यावेळी बंब यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेदेखील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे.

2018-19 मधील भ्रष्टाचार

आमदार प्रशांत बंब यांनी 2018 आणि 2019 सालातील बांधकाम विभागाच्या विविध कामांची तक्रार केली होती. त्यापैकी डांबर न वापरताच बिले जोडणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इतर रस्त्याच्या भ्रष्टाचारा प्रकरणी अद्याप काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बंब यांनी पाठपुरावा करताच त्यांना त्यांच्याकडच्या पुराव्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार बंब आज स्वतः एसीबीच्या कार्यालयात दाखल होत त्यांनी पुरावे दिले आहेत.

इतर बातम्या-

शरद पवारांचा अमरावती दौरा हिंदूचा अपमान करणारा; अनिल बोंडेंचा पुन्हा हल्लाबोल

VIDEO : Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याबाबत पोलीसांना पूर्वकल्पना होती?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली