AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शाब्बास एकनाथजी! योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, राणेंचं सूचक ट्विट

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. "शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता", असं ट्विट राणेंनी केलं आहे.

शाब्बास एकनाथजी! योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, राणेंचं सूचक ट्विट
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 21, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई : मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या कुणाच्याही संपर्कात नाहीत. ते भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

नारायण राणे यांचं ट्विट

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट राणेंनी केलं आहे.

आनंद दिघे कोण आहेत?

आनंद दिघे हे कट्टर शिवसैनिक होते. दिवसेंदिवस आनंद दिघेंचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांच्या नावाला वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत गटबाजी सुरू झाली होती. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी आनंद दिघे यांच्याविषयी एका वेबसाईटशी बोलताना सांगितली आहे.

आनंद दिघेंचा मृत्यू

24 ऑगस्ट 2001 हा दिवस दिघे कुटुंबावर आणि शिवसेनेवर काळ बनून आला होता. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. याच दिवशी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. डोक्याला मार लागला. अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना हार्ट अटॅक आला. 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला आणि रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृत्यू गुढ असल्याचं बोललं जातं. त्याचाच आधार घेत नारायण राणेंनी ट्विट केलंय.

निलेश राणे यांनीही ट्विट केलंय. “ठाकरेंचे दिवस फिरले…”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

निलेश राणे यांचं ट्विट

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.