AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतून तब्बल 72935 नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे.

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?
घराचा प्रतिनिधिक फोटो
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 07, 2022 | 12:29 PM
Share

नाशिकः एक अतिशय आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतून तब्बल 72935 नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार करावी. त्यासासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नियोजन भवनात कार्यशाळा

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नाशिक जिल्हा ‘महा आवास’अभियान 2.0 जिल्हास्तरीय कार्यशाळा झाला. यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कार्यशाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके, जयंत ठोंबरे यांच्यासह जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, प्रशासक आदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

अधिकाऱ्यांना निर्देश

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, समाजातील गरजू व घरापासून वंचित असलेल्या लोकांना ‘महा आवास’ अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य देवून त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावेत. घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत बांधतांना त्यांचा कामाचा दर्जा खालावणार नाही याकडे संबधित अधिकारी व यंत्रणा यांनी कटाक्षाने व जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अधिकाधिक तळागाळातील गरजू घटकांपर्यत घरकुलाचा लाभ पोहचेल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व कामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

72935 घरकुले पूर्ण

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यांनी यावेळी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण नाशिक जिल्हा बाबत माहिती दिली. बावके म्हणाल्या, सन 2016-17 पासून 20 नोव्हेंबर, 2020 हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो. 2020-21 वर्षातील ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण प्रमाणेच सन 2021-22 वर्षात देखील राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण 2.0 राबविण्याचे निश्चित केले आहे. सन 2020-21 या वर्षातील ‘महा आवास’ अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5059 व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत 1775 अशी एकूण 6774 घरकुले नाशिक जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील 69955 लाभार्थ्यांपैकी 58635 (85.49%) घरकुले पूर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये देखील 19111 घरकुलांपैकी 14300 (75.42%) घरकुले म्हणजेच एकूण 72935 घरकुले पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतील शिल्लक घरकुले या ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण 2.0 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.

18668 घरे साकारणार

आवास प्लस (ड यादी) मध्ये 288171 कुटुंबांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 234476कुटुंब सिस्टीमद्वारे पात्र झालेले आहेत. त्यांची अंतिम प्राधान्यक्रम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर यादी ग्रामपंचायत निहाय तयार झाल्यावर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2021-22 करिता प्राप्त उद्दिष्ट 18668 ची मंजुरी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण 2.0 मध्ये देण्यात येईल. या अभियानाच्या 1 ते 10 उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यावेळी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘महा आवास’ अभियान योजनेचे पोस्टर व जिंगल्स यांचे अनावरण करण्यात आले.

इतर बातम्याः

Nashik Omicron| कोरोनाची वावटळ; रुग्णसंख्या 2 हजारांच्या घरात, कारभारी बाहेर पडताना जरा जपून…!

Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?

Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा