AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तापमानाचा पारा वाढतोय, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर, खबरदारीचा उपाय म्हणून घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या

थंडीचा रेकॉर्ड असणाऱ्या शहरात देखील तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील धास्ती घेतली असून रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला जात आहे.

तापमानाचा पारा वाढतोय, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर, खबरदारीचा उपाय म्हणून घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Apr 21, 2023 | 1:35 PM
Share

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत चालला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन केले जात असताना खारघर येथे 14 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यामध्ये देशातील आठ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयारी केली जात असतांना त्या उष्णतेच्या लाटेचा सामना महाराष्ट्र राज्यालाही करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिथे जिथे तापमाणाचा वारा वाढत आहे तिथे स्थानिक प्रशासनाच्या वतीने तयारी केली जात आहे. सरकारी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी कक्ष उभारण्यात आले आहे. तर खाजगी रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

खारघर येथील घटना आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने पालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक सरकारी रुग्णालयात पाच बेड राखीव ठेवण्यात आले आहे. उष्माघाताचे रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची तजबिज केली जात आहे.

नाशिक शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात ही तयारी करण्यात आली आहे. सध्यस्थितीत 20 बेड राखीव ठेवण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर हा काही विशेष आवाहन देखील केले आहे.

दुपारच्या वेळी शक्यतोवर घराच्या बाहेर पडणं टाळा, उन्हात जाणार असाल तर टोपीचा वापर करा. चष्म्याचा वापर करा. याशिवाय गडद रंगाचे कपडे परिधान करू नका असेही आवाहन केले जात आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे.

नाशिक शहरासह मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार यांसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी बाळगली जात आहे. उष्माघाताचे रुग्ण आढळून आल्यास तात्काळ उपचार कसे करता येईल यासाठी प्रयत्न करायचे याची रणनीती आखली जात आहे.

नागरिक दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडणे टाळत असले तरी जे नागरिक बाहेर पडत आहे ते शीतपेयांचे दुकान गाठून तापमानामुळे होणारी अंगाची लाही लाही कमी करत आहे. उसाचा रस, थंड पेय आणि पदार्थ यांच्यापासून गारवा निर्माण करत आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उन्हाळ्यात रेकॉर्डब्रेक तापमान बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत असून नागरिक काळजी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनानेही धास्त घेतल्याचे दिसून येत आहे.

भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात
भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात.
विलीनीकरणाचा पोपट मेला? रोहित पवार सोमवारी बोलणार
विलीनीकरणाचा पोपट मेला? रोहित पवार सोमवारी बोलणार.
नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई
नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई.
चालकाचे लक्ष विचलित होणार नाही का? म्युझिकल रोडवर अमित ठाकरेंची टीका
चालकाचे लक्ष विचलित होणार नाही का? म्युझिकल रोडवर अमित ठाकरेंची टीका.
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले.
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.