AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानासाठी नेत्यांकडून शेतकऱ्यांची उठाठेव, थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था, बाजार समितीच्या निवडणुकीला ग्लॅमर

बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या ग्लॅमर आलं आहे. शेतकरी मतदारांची केलेली व्यवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

मतदानासाठी नेत्यांकडून शेतकऱ्यांची उठाठेव, थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था, बाजार समितीच्या निवडणुकीला ग्लॅमर
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Apr 28, 2023 | 1:54 PM
Share

नाशिक : निवडणुका म्हंटलं की मतदारांची नेत्यांकडून अक्षरशः उठाठेव केली जाते. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे मोजकेच मतदान असले तर मग प्रश्नच येत नाही. मतदार हा खरोखरच राजा होत असतो. सध्या राज्यात बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये आज मतदान पार पडत आहे. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारांची अक्षरशः पळवा पळवी केली जात आहे. त्यामध्ये काही मतदारांना तर अक्षरशः पंचतारांकित हॉटेल मध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून न जाणारे नेते आज मात्र खास व्यवस्था करतांना दिसून येत आहे.

राज्यात बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये अनेक नेत्यांसाठी ह्या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच निवडणूक तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना अशी पाहायला मिळत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व असावे यासाठी अनेक नेते निवडणुकीत आपले नशीब आजमावत असतात. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी विकास पॅनल जो भाजपच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी शेतकरी मतदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते.

शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. मतदारांना मारहाण केल्याचा आरोप करत गुंड असल्याचे म्हंटले आहे. भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी हा आरोप केला आहे.

मतदार शेतकाऱ्यांमुळे आमदार खासदार होता येतं असं म्हणत त्यांनीच आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असे सांगत दिनकर पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे निवडणुकीला नाशिकमध्ये ग्लॅमर आल्याचे पाहायला मिळालं.

खरंतर सरकार स्थापन होत असतांना आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नयेयासाठी अशी खास व्यवस्था केली जाते. तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांना अशी खास व्यवस्था केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच बाजार समितिच्या निवडणुकीत हे वेगळं चित्र पाहायला मिळाले आहे.

त्यामुळे शेतकरी संकटात असतांना त्यांच्याकडे कधी ढुंकुनही न पहाणारे नेते आता शेतकरी मतदारांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेच मतदार आता कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.