AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानासाठी नेत्यांकडून शेतकऱ्यांची उठाठेव, थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था, बाजार समितीच्या निवडणुकीला ग्लॅमर

बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या ग्लॅमर आलं आहे. शेतकरी मतदारांची केलेली व्यवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

मतदानासाठी नेत्यांकडून शेतकऱ्यांची उठाठेव, थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था, बाजार समितीच्या निवडणुकीला ग्लॅमर
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Apr 28, 2023 | 1:54 PM
Share

नाशिक : निवडणुका म्हंटलं की मतदारांची नेत्यांकडून अक्षरशः उठाठेव केली जाते. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे मोजकेच मतदान असले तर मग प्रश्नच येत नाही. मतदार हा खरोखरच राजा होत असतो. सध्या राज्यात बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये आज मतदान पार पडत आहे. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारांची अक्षरशः पळवा पळवी केली जात आहे. त्यामध्ये काही मतदारांना तर अक्षरशः पंचतारांकित हॉटेल मध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून न जाणारे नेते आज मात्र खास व्यवस्था करतांना दिसून येत आहे.

राज्यात बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये अनेक नेत्यांसाठी ह्या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच निवडणूक तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना अशी पाहायला मिळत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व असावे यासाठी अनेक नेते निवडणुकीत आपले नशीब आजमावत असतात. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी विकास पॅनल जो भाजपच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी शेतकरी मतदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते.

शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. मतदारांना मारहाण केल्याचा आरोप करत गुंड असल्याचे म्हंटले आहे. भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी हा आरोप केला आहे.

मतदार शेतकाऱ्यांमुळे आमदार खासदार होता येतं असं म्हणत त्यांनीच आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असे सांगत दिनकर पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे निवडणुकीला नाशिकमध्ये ग्लॅमर आल्याचे पाहायला मिळालं.

खरंतर सरकार स्थापन होत असतांना आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नयेयासाठी अशी खास व्यवस्था केली जाते. तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांना अशी खास व्यवस्था केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच बाजार समितिच्या निवडणुकीत हे वेगळं चित्र पाहायला मिळाले आहे.

त्यामुळे शेतकरी संकटात असतांना त्यांच्याकडे कधी ढुंकुनही न पहाणारे नेते आता शेतकरी मतदारांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेच मतदार आता कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.