AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारसू रिफायनरीवरुन संजय राऊत आणि उदय सामंत यांच्यात जुंपली, उद्धव ठाकरे यांचं पत्रच काढलं…

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पत्राचा आधार घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बारसू रिफायनरीवरुन संजय राऊत आणि उदय सामंत यांच्यात जुंपली, उद्धव ठाकरे यांचं पत्रच काढलं...
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 25, 2023 | 2:31 PM
Share

नाशिक : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर दडपशाहीचा आरोप करत जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका व्यक्त करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवर करत असतांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना यांनीच केंद्र सरकारला दिलेल्या पत्राचा हवाला देत बारसू प्रकल्पाला विरोध हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही उदय सामंत यांनी केला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, खासदार संजय राऊत जालियन वाला बाग हत्याकांड होईल असं म्हणतात त्याबद्दल मला असं वाटतं की आंदोलनाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला नाही जे मनसुबे यांचे होते ते धुळीला मिळाले म्हणून त्यांचा जळफळाट होतो आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधानांना पत्र दिलं त्याच्याबद्दलची साडेनऊच्या इव्हेंटची भूमिका काय ? तिथल्या स्थानिक आमदार रिफायदारीचे समर्थन करत आहे त्यांची त्याच्यावर भूमिका काय? त्यांचा काय राजीनामा घेणार आहेत का? असे सवाल उपस्थित केले आहे,

ज्यांनी पत्र दिलं बारसू ला रिफायनरी व्हावं म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत? स्वतः या सगळ्या गोष्टी सुरु करायच्या आणि जनतेला दाखवायचं का मी तुमच्यासोबत आहे असा तो प्रकार सुरू आहे असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

उदय सामंत यांनी काही लोक समर्थन करत आहे. त्याबद्दलही बोलले पाहिजे. ज्या ठिकाणी शंभर बोर मारायचे होते. त्यातले 50 बोरची लोकांनी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के विरोध आहे. जो विरोध आहे तो गैरसमाजातून आहे.

ज्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढला जाईल. आजच प्रकल्प होणार नाही. कंपनीला वाटेल की आम्ही या ठिकाणी आता प्रकल्प करू शकतो. त्यावेळेस प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. राजकीय वातावरण कुठेतरी तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे.

एकीकडे पत्र द्यायचे त्यामध्ये प्रकल्प करावा अशी विनंती करायची आणि दुसरीकडे बारसू मध्ये रिफायनरीला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका आहे. प्रकल्प गेला म्हणून एकीकडे भाषणे करायची आणि जो येत आहे त्याला विरोध करायचा असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातल्या दीड ते दोन लाख नागरिकांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांना कुठेतरी पाठिंबा द्यायचे सोडून विरोध करणे हे खरोखरच महाराष्ट्राच्या दृष्टीने नुकसान होणारे आहे आहे. मी व्हिडिओ कॉलवर सर्व परिस्थिती दाखवतो म्हणत परिस्थिती निवळल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार