Nashik| अजब तुझे सरकार…अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली…!

नाशिकमध्ये एका विस्तार अधिकाऱ्याने मृत ग्रामसेवकाच्या पेन्शमधून 28 लाखांची वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवला. बरं पेश्नमधून इतकी वसुली झाली, तर मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबाचा उदरर्निवाह होणार कसा, याचा थोडाही विचार या अधिकाऱ्यांनी करू नये, हे अवघडय.

Nashik| अजब तुझे सरकार...अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली...!
cash
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 11:02 AM

नाशिकः अजब तुझे सरकार…अशी म्हणायची पाळी आता आलीय. होय, आपल्या इथे काहीही होऊ शकते. मृत व्यक्ती कागदोपत्री जिवंत दाखवल्याचे आणि जिवंत व्यक्ती कागदोपत्री मृत दाखवल्याचे ढिगाने उदाहरणे सापडतील. याचा त्रास संबंधित कुटुंबांना होतो. अशा उठाठेवी करणारे बहुतांश जण कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. सापडले, तर सहीसलामत बाहेर निघतात. नाशिकमध्ये अशीच काहीशी विचित्र घटना घडली. इथे एका विस्तार अधिकाऱ्यानेच चक्क मृत ग्रामसेवकाच्या नावावर एक-दोन नव्हे, तर चक्क 28 लाखांची वसुली लावली. नेमके प्रकरण काय, सविस्तर जाणून घ्या.

अशी केली उठाठेव

ग्रामसेवक राधेश्याम तात्याराव खोपे यांचा जानेवारी 2021 मध्ये आजारपणात मृत्यू झाला. त्यांच्या ग्रामपंचायत अंतर्गत कामाचे दफ्तर मिळाले नाही. त्यामुळे तब्बल 28 लाखांचा हिशेब लागत नव्हता. हे सारे पाहता विस्तार अधिकाऱ्याने वेगळेच डोके चालवले. त्यांनी हे दफ्तर शोधण्याची तसदी तर घेतलीच नाही. शिवाय पैसे कुठे खर्च झाले, याचा शोध घेणेही सोडले आणि चक्क मृत ग्रामसेवकाच्या पेन्शमधून 28 लाखांची वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवला. बरं पेश्नमधून इतकी वसुली झाली, तर मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबाचा उदरर्निवाह होणार कसा, याचा थोडाही विचार या अधिकाऱ्यांनी करू नये, हे अवघडय. त्यामुळे या अजब वसुलीची जिल्ह्यात आणि विशेषतः कर्मचारी वर्गामध्ये मोठी चर्चा झाली.

अन् वसुली रद्द झाली

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामसेवकांची पेन्शन प्रकरणे अंतिम करण्याची सूचना दिली. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिंडोरी येथे बैठक घेतली. त्यांनी इतर ग्रामसेवकांची मदत घेतली. या 28 लाखाच्या कारवाईचे नेमके कारण काय, याचा तपास केला. तेव्हा ही कामे मेजरमेंट पुस्तकाच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायतीत झाल्याचे समोर आले. त्यामुळे ही 28 लाखांची वसुली रद्द करण्यात आली.

14 ग्रामसेवकांचा मृत्यू

महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या पेन्शन अदालत घेणार आहेत. त्यात जिल्ह्यातील 14 मृत ग्रामसेवकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामपंचायत विभागाच्या एकूण 40 पेन्शन तक्रारी आहेत. त्यात 11 प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. जानेवारी महिन्यात 14 पैकी किमान 10 ग्रामसेवकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

Nashik|पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?

Nashik Train|नववर्षाची सुरुवात नन्नाच्या पाढ्याने, नाशिक मार्गावरच्या 18 गाड्या आजपासून रद्द; प्रवाशांचे बेहाल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.