AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोटा हत्ती, आयशर आणि कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना धडक; नवीन कसारा घाटात विचित्र अपघात

दोन्ही पिकअपमधून कोंबड्यांची वाहतूक सुरू होती. अपघातामुळे दोन्ही पिकअपमधील कोंबड्याही मरून रस्त्यावर पडल्या होत्या. संपूर्ण रस्त्यावर कोंबड्या मरून पडलेल्या होत्या.

छोटा हत्ती, आयशर आणि कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना धडक; नवीन कसारा घाटात विचित्र अपघात
road AccidentImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 05, 2023 | 7:52 AM
Share

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत विचित्र होता. चार गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचं नेमकं कारण समजलं नाही. मात्र, अपघात होताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतीस सुरुवात केली. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप यांच्यात आज पहाटे नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात केले दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही पिकअपमधून कोंबड्यांची वाहतूक सुरू होती. अपघातामुळे दोन्ही पिकअपमधील कोंबड्याही मरून रस्त्यावर पडल्या होत्या. संपूर्ण रस्त्यावर कोंबड्या मरून पडलेल्या होत्या. कसारा पोलीस, महामार्ग पोलीस आणि रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

चंद्रपूरमधील मृतांची संख्या सहावर

दरम्यान, चंद्रपूर येथील नागपूर-नागभीड मार्गावरील कांपा येथे झालेल्या अपघातात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण लोकांची संख्या झाली सहा झाली आहे. गाडीत असलेल्या सर्व लोकांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व मृतक हे नागपुरातील रहिवासी आहेत. नागपूर येथून ब्रम्हपुरी येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल सोबत जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान दोन जण दगावले.

मृतांची नावे

1) रोहन विजय राऊत (30) 2) ऋषिकेश विजय राऊत (28) 3) गीता विजय राऊत (45) 4) सुनीता रुपेश फेंडर (40) 5) प्रभा शेखर सोनावणे (35) 6) यामिनी रुपेश फेंडर (9)

मनमाडमध्ये बस पलटली

दरम्यान, मनमाडपासून जवळच धुळे-पुणे एसटी बस वादळाच्या तडाख्यात सापडली आहे. त्यामुळे मनमाड जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर बस झाली पलटी. बसमधून 43 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी झाले तर उर्वरित प्रवाशांना किरकोळ मार लागला. जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला