AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : राज्याचा नावलौकिक…उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजितदादांचे मोठे वक्तव्य

Ajit Pawar on Udhav Thackeray : बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar : राज्याचा नावलौकिक...उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजितदादांचे मोठे वक्तव्य
अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Aug 11, 2024 | 1:12 PM
Share

राज्यात सध्या राजकारण तापले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आली. त्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यात दिसले. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून मारण्यात आला. या वादावर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. काय म्हमाले अजितदादा?

राजकारणाचा स्तर ढासाळतोय

खरंतर राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासाळत चालला आहे. या सगळ्या संदर्भात म्हणूनच मी ठरवलेलं आहे मी जनसमान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका काय म्हणतोय मी, मी अशी काय बोलतोय मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय हे आपण सगळेजण बघताय त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्र मध्ये कधीच माग घडले नव्हतं जे आता घडतंय ते अक्षरशः महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत.

ह्या ज्या सर्व राजकीय पक्षांनी सत्ताधारी विरोधी पक्षाने सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि ह्या ज्या ज्यांच्याकडे ज्या ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या कडन चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजे, असे आवाहन अजितदादांनी केले.

एका पक्षाचे सरकार नाही

राज्यात एकाच पक्षाची सत्ता येईल, अशी सध्या राजकीय स्थिती नाही. 1995 पासून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी सरकारं आली. एका पक्षाच्या हातात कधी राज्यात सत्ता आली नाही. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली आहे. पण राज्यात अशी स्थिती नाही. राज्यात एका पक्षाचे सरकार येईल अशी स्थिती नसल्याचे अजितदादांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं

मराठा आरक्षणावर अजित दादांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं आपलं स्पष्ट मंत असल्याचे अजितदादा म्हणाले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्याला काही पक्ष उपस्थित नव्हते. आता लोकसभा, राज्यसभेचे अधिवेशन संपणार आहे. सरकारने पुन्हा मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावावी. त्यात सर्वांची बाजू ऐकून घ्यावी. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा