AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Crisis : लासलगावच्या कांद्याला मोठा फटका; बांग्लादेश हिंसाचाराचा असा पण परिणाम, भाव गडगडण्याची भीती

Onion Export : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. 3 हजार टन कांदा शंभरहून अधिक ट्रकमध्ये पडून आहे. कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती आहे. तर शेतकरी अडचणीत सापडण्याची भीती आहे.

Bangladesh Crisis : लासलगावच्या कांद्याला मोठा फटका; बांग्लादेश हिंसाचाराचा असा पण परिणाम, भाव गडगडण्याची भीती
कांदा
| Edited By: | Updated on: Aug 07, 2024 | 1:31 PM
Share

बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. 3 हजार टन कांदा शंभरहून अधिक ट्रकमध्ये पडून आहे. बांगलादेशाच्या बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक ट्रक निर्यातीसाठी उभे आहेत. हा कांदा खराब होण्याची भीती आहे. परिणामी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे बाजार भाव स्थिर आहेत. बांगलादेशात कांदा निर्यात न झाल्यास देशातंर्गत कांद्याचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे.

व्यापाऱ्यांना मोठा फटका

बांगलादेशामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने त्याचा परिणाम आता कांदा निर्यातीवर झाल्याचे दिसून आले. बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत. या ट्रकमध्ये तीन हजार टनाहून अधिक आहे कांदा आहे. जास्त दिवस हे सचार सुरू राहिल्यास कांदा निर्यात न झाल्यास त्यात ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे हा कांदा खराब होईल. या पाठीमागे कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिकमधून मोठी निर्यात

भारत-बांगलादेश सीमेवर नाशिक मधून गेलेले कांद्याचे अनेक ट्रक अडकल्याची माहिती समोर येत आहे. 70 ते 80 ट्रक बांगलादेश च्या सीमेवर अडकले आहेत. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये 80 हजार टन कांद्याची निर्यातसाठी परवानगी दिली होती. नाशिकमधून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते. सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून निघालेले कांद्याचे जवळपास 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेलगत अडकून पडल्याची माहिती समोर येते आहे. शासन स्तरावर हे ट्रक सोडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

इतका होतो कांदा निर्यात

सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा हा बांगलादेशात जातो. बांग्लादेश हा प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या हिंसाचाराचा मोठा परिणाम व्यापारावर झाला आहे. बांगलादेशची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. बांगलादेशाच्या चलनाचे जवळपास 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. त्याचा परिणाम व्यापारावर दिसेल.

देशात सध्या काय भाव

तसेच स्थानिक बाजारात पावसाळी वातावरण असल्याने आवक कमी असल्यामुळे बाजारभाव दोन हजार ते सत्तावीसशे रुपयांपर्यंत स्थिर आहे. बांगलादेशात परिस्थिती आटोक्यात न आल्यास कांदा निर्यात होणार नाही. स्थानिक बाजारात आवक वाढेल आणि भाव गडगडेल. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेश व इतर देशांमध्ये जास्तीत जास्त कशी कांद्याची निर्यात होईल यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकरी संघटना, कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.