AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विश्वासघात झाला… विश्वासघात… रश्मी वहिनी आता घराबाहेर पडा’; भास्कर जाधव यांची साद अन् काळजात कालवाकालव

नाशिकमध्ये अनंत कान्हेरे मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची सभा पार पाडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दमदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाआधी आमदार भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे यांना बाहेर पडण्यासाठी भावनिक साद घातली.

'विश्वासघात झाला... विश्वासघात... रश्मी वहिनी आता घराबाहेर पडा'; भास्कर जाधव यांची साद अन् काळजात कालवाकालव
Bhaskar jadhav Emotional Speech on Rasmi Thackeray in Nashik Sabha
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jan 24, 2024 | 3:26 PM
Share

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना ठाकरे गटाची सभा पार पडली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत भाजपवर आसुड ओढलं. ठाकरेंची तोफ धडाडण्याआधी फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी भावनिक भाषण केलं होतं. विश्वासघात झालाय, आपल्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढलंय. आता बाहेर पडायची वेळ आलीये असं म्हणत भास्कर जाधवांनी रश्मी ठाकरेंना साद घातली.

काय म्हणाले भास्कर जाधव?

उद्धव ठाकरे यांना आवडणार नाही पण आज मी रश्मी ठाकरेंवर भाषण करणार आहे. गेले अनेक दिवस आपल्या माणसांवर अन्याय होत आहे. मात्र या सगळ्यात रश्मी ठाकरे या जराही डगमगल्या नाहीत ना त्यांचा तोल ढळला नाही. याआधी शिवसेनेच्या सभांमध्ये व्यासपीठावर एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपाने धगधगतं अग्निकुंड असायचं तर दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांत माँसाहेब बसलेल्या असायच्या. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, आदित्य ठाकरेंवर आरोप झाले तरीही मी त्यांना डगमगलेलं पाहिलं नाही. अनेक संकट आलीत पण माँसाहेबांसारख्याच रश्मी ठाकरे लढत राहिल्या असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. यावेळी रश्मी ठाकरेसुद्धा भावुक झालेल्या पाहायला मिळालं.

हिंदू धर्माचा सर्वात जास्त अपमान या केंद्र सरकारने केला- भास्कर जाधव

हिंदू धर्माचा सर्वात जास्त अपमान या केंद्र सरकारने केला. शंकराचार्य यांचं योगदान काय, असा प्रश्न विचारला जातो. लघू, सूक्ष्म आणि मध्यम मंत्री असा प्रश्न विचारत आहे? आपण पिसे काढली. तो बामलाव्या (रामदास कदम) आज अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं म्हणत भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि कदम यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, काँग्रेसच्या नेत्याने आदित्य ठाकरे यांना सांगितलं, की या चाळीस कुत्र्यांनी तुमच्या वडिलांना घेरलं आणि तुम्ही लढला म्हणून तुम्ही मला आवडता. पत्रकार मला विचारत आहेत की तेजस ठाकरे आरतीला बसले होते. ते कधी राजकारणात उतरणार आहेत. यावर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत मला माहिती नाही पण त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळी ते गरूड झेप घेतील. कारण तो वाघाचा बछडा असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक