AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : भक्तीचे नव्हे, हे शक्तीचे राजकारण, भुजबळांचा आसूड; नाशिकमध्ये धारीवाल हॉस्पिटल-रिसर्च सेंटरचे उदघाटन

भुजबळ म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते असून, हे भक्तीचे राजकारण नसून शक्तीचे राजकारण आहे. लोकांना दुःख देणारे आणि अशांतता निर्माण करणारे राजकारण सध्या देशभरात सुरू आहे. शांततेचा मार्ग अवलंबिला, तर त्यात सर्वांचे सुख आहे.

Chhagan Bhujbal : भक्तीचे नव्हे, हे शक्तीचे राजकारण, भुजबळांचा आसूड; नाशिकमध्ये धारीवाल हॉस्पिटल-रिसर्च सेंटरचे उदघाटन
छगन भुजबळांनी आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांची भेट घेतली.
| Updated on: Apr 17, 2022 | 3:34 PM
Share

नाशिकः जगभरात धर्माच्या नावाखाली भांडणे आणि युद्ध सुरू आहे. देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते असून, हे भक्तीचे राजकारण नसून शक्तीचे राजकारण आहे. त्यामुळे सगळीकडे द्वेष पसरत असून शांतता भंग होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतता आणि सत्याचा मार्ग अवलंबावा अशी शिकवण दिली. भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश जर जगाने स्वीकारला, तर जगभरात कुठेही भांडण होणार नाही. जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार अतिशय उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी परिसरात महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री. रसिकलाल एम. धारीवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे (Dhariwal Hospital and Research Center) उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आचार्य श्री पुलकसागरजी महाराज, शोभाताई धारीवाल,जान्हवी धारीवाल, रमणलाल लुंकड, सोहनलाल भंडारी, माजी महापौर रंजना भानसी, नंदलाल पारख, डॉ. एन. पी. छाजेड, मदनलाल साखला, विलास शहा, राजेंद्र जैन, डॉ. प्रशांत छाजेड, रमेश फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिकमध्ये चांगले हॉस्पिटल

भुजबळ म्हणाले की, स्व. हुकूमचंद बागमर यांनी नाशिक शहर आणि समाजासाठी मोठे योगदान दिले. चांगले काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र, ते डगमगले नाहीत. सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. अतिशय चांगले हॉस्पिटल नाशिकमध्ये उभे राहिले आहे.रुग्णसेवेसाठी सारखी दुसरी कुठलीच सेवा नाही. मानवतेचा धर्म या ठिकाणी निभावला जाणार आहे. बॉर्डरवर लढणारा सैनिक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच कोरोनात रुग्णांचा जीव वाचविणारा डॉक्टर महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

द्वेषाच्या वातावरणाची निर्मिती

भुजबळ म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते असून, हे भक्तीचे राजकारण नसून शक्तीचे राजकारण आहे. लोकांना दुःख देणारे आणि अशांतता निर्माण करणारे राजकारण सध्या देशभरात सुरू आहे. शांततेचा मार्ग अवलंबिला, तर त्यात सर्वांचे सुख आहे, असे सांगत पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आरोग्याच्या अनेक समस्या वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.