
Dada Bhuse And Sanjay Raut: खासदार संजय राऊतांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बदनामी केल्याचे सांगत फौजदारी खटला भुसे यांनी मालेगाव न्यायालयात दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणाीसाठी आज संजय राऊत आणि भुसे मालेगाव कोर्टात हजर झाले. यावेळी दादा भुसे यांनी राऊतांवरील दाखल खटला मागे घेतल्याचा दावा केला. तर आमची मैत्री कायम असल्याचे वक्तव्य करून राऊतांनी अनेकांच्या विकेट काढल्या. त्यामुळे पडद्यामागे काही घडणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
आमचे मैत्रीचे संबंध कायम
हा खटला मागे घेतल्यानंतर दोन्ही नेते एकत्रच माध्यमांसमोर आले. त्यावेळी संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यांसोबतची मैत्रीचे संबंध कायम राहतील अशी ग्वाही दिली. कोर्टात खटला चालू होता. दादा भुसे आणि आमच्यात तोडगा निघाला आहे. मी जे विधान केलं होतं. ते चुकीचं होतं, असे राऊत म्हणाले. हे नंतर माझ्या पडताळणीनंतर लक्षात आलं. त्यामुळे मी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नव्हता. अद्वैत हिरे यांनी जी माहिती दिली त्यामुळे आम्ही त्यात गुंतलो.आता आम्ही खटला मागे घेतला. अद्वैत हिरे सत्तेत आहेत. त्यांना लढायचं तर ते लढू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले. आता वादाचा विषय संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. दादा भुसे आणि माझे मैत्रीचे संबंध कायम आहेत. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपवला आहे. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून संपवला असे दादा भुसे यावेळी म्हणाले.
दादा भुसे म्हणाले काय?
यावेळी माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले की, राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. त्यामुळे खटला मागे घेऊ. त्यांचा मान राखू असं शेतकर्यांनी सांगितलं आहे. आम्ही राऊत यांच्या हाताखाली काम केलं आहे. दादा भुसे काय करतो आणि काय करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यांनी खातरजमा केली नाही. पण नंतर माहिती घेतल्यावर त्यांनी चूक दुरूस्त केली.