AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी,या गद्दारांबरोबर जायला नको होतं”; बच्चू कडू यांना शेतकऱ्याने सुनावलं..

शेतकऱ्यानी स्पष्टपणे आपली भूमिका मांडल्यानंतर बच्चू कडू यांनीही त्या शेतकऱ्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उदाहरण देत गद्दार आमदारांच्या विषयाला त्यांनी बगल दिली.

भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी,या गद्दारांबरोबर जायला नको होतं; बच्चू कडू यांना शेतकऱ्याने सुनावलं..
| Edited By: | Updated on: Mar 09, 2023 | 10:49 PM
Share

निफाड/नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव अशा अनेक भागातील शेतकऱ्यांनी उभा पिकावर आता नांगर फिरवला आहे. त्यानंतर आता जनसामान्यांचा, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील नैताळे येथील शेतकऱ्याची भेट घेतली. निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला नाही म्हणून त्यांनी आपल्या कांदा पिकावर रोटर फिरवला होता.

ही घटना आमदार बच्चू कडू यांना समजताच त्यांनी शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी ते नैताळे येथे आले होते. मात्र बच्चू कडू येताच शेतकऱ्यांनीही आपल्या मनातील भावना त्यांच्याजवळ बोलून दाखवल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यापूर्वी बंडखोरी करून मुंबई-सूरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन कित्येक दिवस झाले तरीही अजून आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळेही आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ती नाराजी अनेकदा त्यांच्यासमोर बोलूनही त्यांनी दाखवली आहे.

यावेळी तसाच प्रसंग समोर आला आणि त्याला आमदार बच्चू कडू यांनाही सामोरं जावं लागलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी म्हणून बच्चू कडू नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावी आले होते.

मात्र यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका मान्य नसल्याने त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. यावेळी शेतकरी बच्चू कडू यांना म्हणाले की, “भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात मात्र या गद्दारांबरोबर तुम्ही जायला नको होत” अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शविला.

यावेळी शेतकऱ्यानी स्पष्टपणे आपली भूमिका मांडल्यानंतर बच्चू कडू यांनीही त्या शेतकऱ्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उदाहरण देत गद्दार आमदारांच्या विषयाला त्यांनी बगल दिली.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....