AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : तुम्हाला दुरुस्त करावंच लागेल, गुलाबराव पाटलांचा थेट शिवसेना नेतृत्वालाच सल्ला, फडणवीसांचही कौतुक

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Rajya Sabha Election Results 2022 : तुम्हाला दुरुस्त करावंच लागेल, गुलाबराव पाटलांचा थेट शिवसेना नेतृत्वालाच सल्ला, फडणवीसांचही कौतुक
गुलाबराव पाटील/देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
| Updated on: Jun 11, 2022 | 11:11 AM
Share

नाशिक : देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चाल तुम्हाला योग्य वाटली नसेल तर तुम्हाला दुरूस्त करावे लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा थेट सल्ला शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नेतृत्वाला दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आपली एक सीट पडत आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांची चाल यशस्वी झाली, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील या पराभवाबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वालाच गंभीरतेने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की मनात नव्हता असा निकाल आला आहे. व्हीप (Whip) असल्याने पक्षाच्या लोकांचे चुकलेले नाही, मात्र 10 लोकांनी गडबड केली आणि विरोधक त्यांच्या चालीत यशस्वी झाले, असा आरोप त्यांनी केला.

‘लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो’

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे म्हटले. ते काय आपली आरती करणार नाही. त्यांचा गेम यशस्वी ठरला आहे. शेवटी विश्वास ठेवावा लागतो, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये कोटा ठरवण्याबाबत वाद नव्हता. कोटा कमी केला काय किंवा वाढवला काय. लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो. ते सांभाळले असते, तर असे झाले नसते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजपाला मिळालेली मदत आम्हाला मिळाली असती तर विजय झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

‘वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल’

शिवसेनेला फायदा होईल ते करणे आता गरजेचे आहे. सिंहावलोकन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे या निकालावरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. 20 तारखेपर्यंत आओ मेरे घर असेच म्हणावे लागेल. विरोधक चालीत यशस्वी झाले. आता आम्हाला चिंतन, मनन करायची गरज आहे. शिवसेनेला फायद्याचे होईल ते वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल. आत्ताच योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.