AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : तुम्हाला दुरुस्त करावंच लागेल, गुलाबराव पाटलांचा थेट शिवसेना नेतृत्वालाच सल्ला, फडणवीसांचही कौतुक

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Rajya Sabha Election Results 2022 : तुम्हाला दुरुस्त करावंच लागेल, गुलाबराव पाटलांचा थेट शिवसेना नेतृत्वालाच सल्ला, फडणवीसांचही कौतुक
गुलाबराव पाटील/देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 11, 2022 | 11:11 AM
Share

नाशिक : देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चाल तुम्हाला योग्य वाटली नसेल तर तुम्हाला दुरूस्त करावे लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा थेट सल्ला शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नेतृत्वाला दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आपली एक सीट पडत आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांची चाल यशस्वी झाली, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील या पराभवाबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वालाच गंभीरतेने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की मनात नव्हता असा निकाल आला आहे. व्हीप (Whip) असल्याने पक्षाच्या लोकांचे चुकलेले नाही, मात्र 10 लोकांनी गडबड केली आणि विरोधक त्यांच्या चालीत यशस्वी झाले, असा आरोप त्यांनी केला.

‘लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो’

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे म्हटले. ते काय आपली आरती करणार नाही. त्यांचा गेम यशस्वी ठरला आहे. शेवटी विश्वास ठेवावा लागतो, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये कोटा ठरवण्याबाबत वाद नव्हता. कोटा कमी केला काय किंवा वाढवला काय. लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो. ते सांभाळले असते, तर असे झाले नसते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजपाला मिळालेली मदत आम्हाला मिळाली असती तर विजय झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

‘वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल’

शिवसेनेला फायदा होईल ते करणे आता गरजेचे आहे. सिंहावलोकन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे या निकालावरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. 20 तारखेपर्यंत आओ मेरे घर असेच म्हणावे लागेल. विरोधक चालीत यशस्वी झाले. आता आम्हाला चिंतन, मनन करायची गरज आहे. शिवसेनेला फायद्याचे होईल ते वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल. आत्ताच योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?