AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त…

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 10, 2023 | 3:36 PM
Share

इगतपुरी/ नाशिक : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी गारपिटीने इगतपुरी तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढणीला आलेला टोमॅटो, ज्वारी, कांदा ही पिके आता जमिनदोस्त झाली आहेत. आधीच कर्जाचा बोजा त्यानंतर अवकाळीचा तडाखा यामुळे उत्पादन खर्चदेखील निघणे आता मुश्किल झाले आहे. त्यातच झालेल्या गारपिटीमुळे पिके पावसात सापडल्याने पुन्हा एकदा अस्मानी संकटाने शेतकरीराजा भरडला गेला आहे.

आधीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, मात्र असता अजून त्या नुकसान भरपाईचे पैसेच भेटले नाहीत. त्यात पुन्हा एकदा अवकाळीचा मारामुळे जगावे कसे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

शासन जगू देईना पाऊस जगू देईना तर शेवटी आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचे शेनित येथील शेतकरी त्रंबक जाधव यांनी सांगितले.

या अवकाळी पावसाने प्रचंड मोठे नुकसान शेतीचे केले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे करायचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

Igatpuri Rain

अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतात गारांचा खच साचला होता

तर आताही शेतात चांगले पीक आलेले असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Igatpuri

इगतपुरीमध्ये गारपीट झाल्यानंतर शेतीवर पडलेला गारांचे अच्छादन

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता. त्यामुळे या पिकांचे आता करणार काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

Follow Us
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...