AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त…

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 10, 2023 | 3:36 PM
Share

इगतपुरी/ नाशिक : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी गारपिटीने इगतपुरी तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढणीला आलेला टोमॅटो, ज्वारी, कांदा ही पिके आता जमिनदोस्त झाली आहेत. आधीच कर्जाचा बोजा त्यानंतर अवकाळीचा तडाखा यामुळे उत्पादन खर्चदेखील निघणे आता मुश्किल झाले आहे. त्यातच झालेल्या गारपिटीमुळे पिके पावसात सापडल्याने पुन्हा एकदा अस्मानी संकटाने शेतकरीराजा भरडला गेला आहे.

आधीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, मात्र असता अजून त्या नुकसान भरपाईचे पैसेच भेटले नाहीत. त्यात पुन्हा एकदा अवकाळीचा मारामुळे जगावे कसे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

शासन जगू देईना पाऊस जगू देईना तर शेवटी आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचे शेनित येथील शेतकरी त्रंबक जाधव यांनी सांगितले.

या अवकाळी पावसाने प्रचंड मोठे नुकसान शेतीचे केले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे करायचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

Igatpuri Rain

अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतात गारांचा खच साचला होता

तर आताही शेतात चांगले पीक आलेले असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Igatpuri

इगतपुरीमध्ये गारपीट झाल्यानंतर शेतीवर पडलेला गारांचे अच्छादन

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता. त्यामुळे या पिकांचे आता करणार काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली