AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त…

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त...
| Edited By: | Updated on: Apr 10, 2023 | 3:36 PM
Share

इगतपुरी/ नाशिक : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी गारपिटीने इगतपुरी तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढणीला आलेला टोमॅटो, ज्वारी, कांदा ही पिके आता जमिनदोस्त झाली आहेत. आधीच कर्जाचा बोजा त्यानंतर अवकाळीचा तडाखा यामुळे उत्पादन खर्चदेखील निघणे आता मुश्किल झाले आहे. त्यातच झालेल्या गारपिटीमुळे पिके पावसात सापडल्याने पुन्हा एकदा अस्मानी संकटाने शेतकरीराजा भरडला गेला आहे.

आधीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, मात्र असता अजून त्या नुकसान भरपाईचे पैसेच भेटले नाहीत. त्यात पुन्हा एकदा अवकाळीचा मारामुळे जगावे कसे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

शासन जगू देईना पाऊस जगू देईना तर शेवटी आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचे शेनित येथील शेतकरी त्रंबक जाधव यांनी सांगितले.

या अवकाळी पावसाने प्रचंड मोठे नुकसान शेतीचे केले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे करायचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

Igatpuri Rain

अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतात गारांचा खच साचला होता

तर आताही शेतात चांगले पीक आलेले असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Igatpuri

इगतपुरीमध्ये गारपीट झाल्यानंतर शेतीवर पडलेला गारांचे अच्छादन

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता. त्यामुळे या पिकांचे आता करणार काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.