AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी…

काहीतरी शेतात वेगळे करूया 1 लाख रुपये कर्ज घेत टोमॅटोचे पीक घेतले गेले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जोमदार आलेले टोमॅटोचेही पीकही आता भुईसपाट झाले आहे.

कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 08, 2023 | 5:33 PM
Share

लासलगाप/नाशिक : कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा बाजार भाव कोसळल्याने चांगलेच वांदे झाले आहेत. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव जवळील वाकी खुर्द येथील संतोष देवडे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा तोट्यात विक्री करावा लागला आहे,

तर टोमॅटोतून काहीतरी भेटेल म्हमून त्यांनी टोमॅटोचेही पीक घेतले होते पण वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या टोमॅटो पिकाचा लाल चिखल झाल आहे.

लासलगाव जवळील वाकी खुर्द येथील शेतकरी संतोष देवडे यांची दोन एकर शेती असून एक एकर शेतात 60 ते 70 हजार रुपये खर्च करत लाल कांद्याचे पीक घेतले होते.

शेतातील हे पीकही जोमदार आले होते. कांदा काढणीला सुरुवात झाली, मात्र त्यानंतर कांद्याचे बाजार भाव दररोज कोसळण्यास सुरुवात झाली.

या बाजारभावाचा परिणाम शेतकऱ्यांचा साधा मजूरीचाही खर्च निघला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतूक आणि शेतातून कांदा काढणी याचा विचार केला तर एक लाख रुपयांपर्यंत खर्च गेला होता,

तर हातात मात्र 50 हजार रुपये 50 हजार रुपये तोट्यात अशी परिस्थिती होती. त्यामुळे लाल कांदा विक्री केला गेला तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा घेतलेले कर्ज कसे फेडावे, मुलांचे शिक्षण कसे करावे या विवंचनेत असल्याचे पत्नी शैला यांनी सांगितले.

काहीतरी शेतात वेगळे करूया 1 लाख रुपये कर्ज घेत टोमॅटोचे पीक घेतले गेले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जोमदार आलेले टोमॅटोचेही पीकही आता भुईसपाट झाले आहे.

त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या संकटामुळे आता काय करावा असा मोठा प्रश्न आता देवडे कुटुंबीयांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या संकटाकडे लक्ष देण्याची गरज आहे असं आता हे देवडे कुटुंबीय सांगत आहेत.

Follow Us
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?