AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Bomb blast : यासाठीच घडवण्यात आला स्फोट, 16 वर्षानंतर NIA ने केला मोठा खुलासा; अंतिम सुनावणीत काय केला युक्तीवाद

Final Hearing Court : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास हाती घेतल्यानंतर अंतिम सुनावणीत मोठा दावा केला आहे. 2008 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. 16 वर्षानंतर याप्रकरणी अंतिम सुनावणी सुरु आहे.

Malegaon Bomb blast : यासाठीच घडवण्यात आला स्फोट, 16 वर्षानंतर NIA ने केला मोठा खुलासा; अंतिम सुनावणीत काय केला युक्तीवाद
मालेगाव बॉम्ब स्फोट
| Updated on: Jul 26, 2024 | 10:04 AM
Share

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणा आता अंतिम सुनावणी सुरु आहे. 16 वर्षानंतर गुरुवारी अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास हाती घेतल्यानंतर याप्रकरणात मोठा खुलासा केला आहे. देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, दोन समाजात फुट फाडण्यासाठीच हा स्फोट घडवून आणल्याचे एनआयने स्पष्ट केले. गुरुवारी फिर्यादींच्या वतीने अंतिम सुनावणीत बाजू मांडण्यात आली. याप्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींविरोधात खटला सुरु आहे.

16 वर्षांपूर्वी स्फोट

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी अंजुमन चौक ते भीकू चौक या दरम्यान असलेल्या शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर स्फोट झाला होता. रात्री 9:35 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते.

कोण आहेत आरोपी

फिर्यादींनी याप्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची मोटारसायकल या स्फोटासाठी वापरल्याचा आरोप केलेला आहे. आरोपी समीर कुलकर्णी यांच्याविरोधातील खटल्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. प्रज्ञा ठाकूर आणि पुरोहित यांच्यासह या प्रकरणात मेजर रमेश उपाध्याय (सेवानिवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चुतर्वेदी यांचा समावेश आहे. सर्वांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत खटला सुरु आहे.

जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच स्फोट

विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ यांनी एनआयएची बाजू मांडली. रमजान महिना सुरु होता आणि नवरात्रोत्सव सुरु होणार होता. नागरिकांमध्ये दहशत माजवण्याच्या, जीवित आणि मालमत्तेच्या हानीच्या उद्देशाने सूत्रधारांनी हा स्फोट घडवला. जातीय तेढ निर्माण करणे. राज्याची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवल्याचा युक्तीवाद एनआयएने केला आहे.

काश्मीरमधून आरडीएक्स

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सुरुवातीला तपास केला. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवण्यात आला. एटीएसच्या तपासाच्या आधारे , आरोपी पुरोहितने या स्फोटासाठी काश्मीरमधून आरडीएक्स आणल्याचा युक्तीवाद फिर्यादी पक्षाने कोर्टात केला. आरडीएक्सचा हा साठा पुरोहितने त्याच्या घरात ठेवल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.