AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य संकटात तरीही सत्ताधारी कधी राम, कधी अयोध्येचा वापर करताय, शरद पवारांची टीका

राज्य आज संकटांचा सामना करत आहे तरीही आताचे सत्ताधारी कधी राम, कधी अयोध्या याचा वापर करत असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

राज्य संकटात तरीही सत्ताधारी कधी राम, कधी अयोध्येचा वापर करताय, शरद पवारांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
| Updated on: Apr 08, 2023 | 11:39 PM
Share

नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचं काम तुमच्या कष्टामुळे सुरू आहे. आज मुंबईचा उल्लेख औद्योगिक राजधानी म्हणून कुणी करत नाही. तर आर्थिक राजधानी म्हणून उल्लेख करतात असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. एकेकाळी मुंबई शहरात 110, 120 टेक्सटाइल मिल होत्या, मात्र आज गिरगावात चाळ, खोली दिसत नाहीत. उंचच उंच इमारती दिसतात. तसेच कापड गिरण्यांच्या आज कुठेच जुन्या चिमण्या दिसत नाही अशी खंतही शरद पवार यांनी आज व्यक्त केली. त्याच प्रमाणे आज घाम गाळणारा वर्गही कुठेच दिसत नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी आज मुंबईबरोबरच देशातील कष्टकरी माणसांचे जीवन किती हलाखीचे झाले आहे.ते सांगत औद्योगिकीकरणामुळे जनसामान्यांचे जीवनही बदलून गेल्याचे त्यानी सांगितेल. तर दुसरीकडे आज अनेक ठिकाणी सरकारी कामं बंद होत असल्याची खंतही त्यांनी आज व्यक्त केली.

हिंदू मजदूर संघाविषयी गौरवोद्गगार काढताना शरद पवार यांनी म्हटले की, तुमच्या संघटनेने सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवण्यासाठी खबरदारी घेतली. त्याचमुळे जनसामान्यांसाठी आपली शक्ती मजबूत करायला हवी असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

देशात आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. देशातील आणि राज्यातील नागरिक बेरोजगारी, महागाई या ओझ्याखाली दबला गेला आहे.

राज्यातील शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी पडलेल्या बाजारभावामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तरीही देशात आज धर्म आणि जाती यांच्यामुळे फूट पडत आहे.

त्याच बरोबर देशात आज महागाई, नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता वापरली पाहिजे असा सल्लाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

राज्य आज संकटांचा सामना करत आहे तरीही आताचे सत्ताधारी कधी राम, कधी अयोध्या याचा वापर करत असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...