AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मालेगावमध्ये घरात पाण्याचा ठणठणाट, रस्त्यावर महापूर; ऐन उन्हाळ्यातले हे चित्र पाहाच!

मालेगावमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. त्यात ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक तीन महिने पुढे ढकलली गेलीय. मात्र, तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची ठिकाठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना योग्य ती खरबदारी घेतली जात नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसतोय.

VIDEO | मालेगावमध्ये घरात पाण्याचा ठणठणाट, रस्त्यावर महापूर; ऐन उन्हाळ्यातले हे चित्र पाहाच!
मालेगावमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 9:48 AM
Share

मालेगावः ऐन उन्हाळ्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये घरोघरी पाण्याचा (Water) ठणठणाट आहे, तर रस्त्यावर महापूर दाटलाय. जलवाहिनी (Pipeline) फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जुना आग्रा रोडवरील रस्त्याचे काम सुरू असताना पाइपलाइन फुटली आणि पुरवठा विस्कळीत झाला. खरे तर शहराचा पाणीपुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी. येथून जास्त दाबाने पुरवठा सुरू असतो. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीचा एक फटका जलवाहिनीला बसला आणि रस्त्यावर उंचच उंच पाण्याचे फवारे उडाले. कितीतरी वेळ प्रचंड दाबाने पाण्याचा निचरा सुरू होता. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. रस्त्यावर तर दुथडी भरून नदीच वाहतेय, असे चित्र होते. मात्र, आता दुरुस्ती होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या महिन्यातही जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मालेगावकरांना पाण्यासाठी वणवण करायची पाळी येतेय.

निवडणुकीच्या तोंडावर कामे जोरात

मालेगावमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. त्यात ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक तीन महिने पुढे ढकलली गेलीय. मात्र, तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची ठिकाठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना योग्य ती खरबदारी घेतली जात नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसतोय. वारंवार जलवाहिनी फुटतेय. त्यामुळे नागरिकांमध्ये पराकोटीचा संताप आहे.

यंदा पाऊस होऊनही…

विशेष म्हणजे यंदा जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल केले. खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील नदी, विहिरी सध्या तुडूंब आहेत. बहुतांश ठिकाणी यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे चित्र आहे. मात्र, कृत्रिम अडचणींमुळे पुन्हा एकदा अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. थोडी जरी दक्षता घेतली तरी, अशा चुका टाळता येऊ शकतात. त्यामुळे रस्त्याची कामे लक्ष देऊन करावी. महिन्यातून दोनदा आणि तीनदा जलवाहिनी फुटली, तर या कामाचा उपयोग काय, असा सवाल होत आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.