AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : भोंग्याबाबत नवे साहेब निर्णय घेतील; मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो हे विसरून जाणार, काय म्हणाले पांडेय?

गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडेय यांच्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यात हेल्मटसक्तीचा केलेला अतिरेक. ते थेट काही दिवसांपूर्वी त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात फोडलेला लेटरबॉम्ब. यामुळे स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाराज झाले. त्यांनी पांडेय यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तर महसूल संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

Nashik : भोंग्याबाबत नवे साहेब निर्णय घेतील; मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो हे विसरून जाणार, काय म्हणाले पांडेय?
बदलीनंतर दीपक पांडेय यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 9:57 AM
Share

नाशिकः जिल्ह्यात भोंग्याबाबत आता नवे साहेब निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गुरुवारी नाशिकहून (Nashik) बदली झालेले पोलीस आयुक्त (Commissioner) दीपक पांडेय यांनी दिली. राज्य सरकारने कालच पोलीस (Police) खात्यामध्ये अनेक फेरबदल केले आहेत. त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची बदली केली आहे. तर पांडेय यांना मुंबई येथील महिला सुरक्षा विभाग प्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पांडेय यांच्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यात हेल्मटसक्तीचा केलेला अतिरेक. ते थेट काही दिवसांपूर्वी त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात फोडलेला लेटरबॉम्ब. यामुळे स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाराज झाले. त्यांनी पांडेय यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तर महसूल संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या साऱ्या प्रकरणानंतर पांडेय यांनी बदलीची मागणी केल्याचे समोर आले होते. त्यानुसार त्यांची बदली झाली. पांडेय यांनी आज बदलीनंतर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

भोंगे सोडून बोला…

नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भोंग्याबाबत घेतलेला निर्णयही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काहींनी त्यांचे कौतुक केले, तर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध. या साऱ्या प्रकरणावर ते म्हणाले, भोंग्याबाबतचा निर्णय आता नवे साहेब घेतील. मी विसरुन जाणार आहे की, मी इथे आयुक्त होतो. मी मोकळा होतोय. त्यामुळे भोंग्याच्या निर्णयाबाबत आता मी काही बोलणार नाही.

बदली ही नॉर्मल प्रक्रिया

पांडेय म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात बदली ही नॉर्मल प्रक्रिया आहे. मीच 20-25 दिवसांपूर्वी व्यक्तिगत कारणास्तव बदलीसाठी अर्ज केला होता. सरकारने विनंती ऐकली. त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्यावर आता अधिक मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे ते म्हणाले.

कोणते प्रकरण भोवले का?

राणेंच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा, भोंगे किंवा हेल्मेटचा निर्णय यामुळे बदली झालीय का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, रुल ऑफ रॉ चे हे सर्व विषय एकदम सोपे विषय आहेत. माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. मी रुल ऑफ रॉ समोर ठेवूनच काम केले. आमच्या आदेशावर शासन आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे. तिथे आमच्या आदेशाला आव्हान देता येऊ शकते. पण आम्ही शपथ घेतो की, आम्ही संविधानाच्या रक्षणाचे काम करणार आहोत. आमची जबाबदारी नागरिकांप्रती आहे. समाजाला काही फायदा होणार की नाही. मला एखाद्या आदेशाने समाधान वाटतेय की नाही, याचे ट्रेनिंगही दिलं जाते. मात्र, एक एक्स्झिक्युटिव पोस्टिंग झाल्यानंतर एक साइड पोस्टिंग झाली पाहिजे. त्यामुळे बॅटरी चार्ज होते. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.