AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकची लाइफलाइन गोदावरी एक्स्प्रेस 2 वर्षांनंतर सुरू; लासलगावमध्ये झोकात स्वागत

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकची लाइफलाइन गोदावरी एक्स्प्रेस 2 वर्षांनंतर सुरू; लासलगावमध्ये झोकात स्वागत
गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे स्वागत करण्यात आले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 11, 2022 | 3:46 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव (Lasalgaon), निफाड व नाशिक येथील चाकरमानी व प्रवाशांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस रेल्वे (Railway) दोन वर्षांच्या कालखंडानंतर अखेर आजपासून सुरू झाली. लासलगाव रेल्वे स्थानकात गोदावरी एक्स्प्रेस येताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लासलगाव येथे गोदावरी एक्स्प्रेस येताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डिके जगताप यांनी सत्कार केला. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे मनमाड- कुर्ला टर्मिनस गोदावरी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, गोदावरी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण ती सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडून सतत नकार घंटा देण्यात येत होती.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू…

गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय, तर प्रवाशांसह चाकरमान्यांचे होत असलेले हाल याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली. त्यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मनमाड येथून नाशिकपर्यंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासह भाजप कार्यकत्यांनी प्रवासही केला.

नाशिक-कल्याण कधी?

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. या रेल्वे सेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली