AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगेसोयरेच्या अध्यादेशावर नाथाभाऊंना शंका; खडसे म्हणाले, आजचं मरण…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजाचा प्रचंड दबाव होता आणि या दबावामुळे सरकार झुकलं. त्यादृष्टीने सरकारने हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवलं असं म्हणता येईल. मात्र उद्या जर फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसेच अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकणार की नाही याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली आहे.

सगेसोयरेच्या अध्यादेशावर नाथाभाऊंना शंका; खडसे म्हणाले, आजचं मरण...
eknath khadseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 27, 2024 | 3:14 PM
Share

किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 27 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश आलं आहे. राज्य सरकारने अखेर सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण सरकारच्या या अध्यादेशावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संशय घेतला आहे. सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर किती टिकेल याची शंका आहे. सरकारने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सरकारने आजच मरण उद्यावर ढकलावं या दृष्टीने हा अध्यादेश काढलेला दिसतोय. सरकार या अध्यादेशाद्वारे मराठा समाजाची दिशाभूल करतंय का काय? असं होता कामा नये. कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकला पाहिजे. पण हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याबाबत मला शंका आहे. कारण सगेसोयरे रक्ताच्या नात्यात येत नाही. त्यामुळे सरकार अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल करतंय की काय असं वाटतं. तसं होऊ नये, असं आमदार एकनाथ खडसे म्हणाले.

तर किए किराएवर पाणी

मराठा समाजाचा प्रचंड दबाव होता आणि या दबावामुळे सरकार झुकलं. त्यादृष्टीने सरकारने हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवलं असं म्हणता येईल. मात्र उद्या जर फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ही पीटिशन दाखल आहे, त्यांनतर हा निर्णय झाला असता, तर तर कायद्याच्या चौकटीमध्ये निकषांमध्ये बसवून घेतल्यासारखे वाटले असते. क्युरेटिव्ह पीटिशनचा निर्णय वेगळा आला आणि त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेश विसंगत निघाला तर सरकारच्या किए किराएवर पाणी फिरल्यासारखे होईल, असं ते म्हणाले.

भुजबळच सांगू शकतील

छगन भुजबळ हे सरकारमध्ये महत्त्वाचं मंत्रिपद भूषवत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात काय घडलं? नेमकी काय चर्चा झाली? हे माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने भुजबळ सांगू शकतील. त्यामुळे मंत्रिमंडळातला एखादा सदस्य मत व्यक्त करतो तेव्हा त्याला अधिक महत्त्व असतं. त्या मताला अधिक वजन असतं, असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.