AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे रुग्णांची तडफड, दुसरीकडे 60 व्हेंटिलेटर धूळखात, नाशिकमध्ये गलथानपणाचा कळस

मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. | ventilators

एकीकडे रुग्णांची तडफड, दुसरीकडे 60 व्हेंटिलेटर धूळखात, नाशिकमध्ये गलथानपणाचा कळस
| Updated on: May 08, 2021 | 11:21 AM
Share

नाशिक: एकीकडे राज्यात प्राणरक्षक प्रणालीअभावी (व्हेंटिलेटर्स) रुग्ण मरत असताना नाशिकमध्ये प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा नमुना समोर आला आहे. नाशिकमध्ये व्हेंटिलेटर बेड (ventilator bed) वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना, दुसरीकडे मात्र नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलिटर मिळूनही ते जोडणी अभावी अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (PM cares fund ventilators not used by Nashik Mahanagar Palika)

याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी करुन रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.

‘देशात लोक मरतायत, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारतात ऑक्सिजन (Oxygen) आणि वैद्यकीय साधनसामुग्रीचा पाठवायला सुरुवात केली होती. मदतीचा हा ओघ प्रचंड असल्याने साधारण प्रत्येक दिवशी भारतात वैद्यकीय साधनसामुग्री (Medical Aid) असलेली विमाने उतरत आहेत. मात्र, ही सर्व मदत नक्की जात कुठे आहे, असा सवाल आता अनेकजण उपस्थित करत आहेत.

सुरुवातीला केवळ विरोधकच हा प्रश्न विचारत होते. मात्र, आता यामध्ये अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एका पत्रकारपरिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अमेरिकी करदात्यांच्या पैशातून भारताला पाठवली जात असलेली मदत नेमकी कुठे पोहोचत आहे? या मदतीचे वितरण कशाप्रकारे होत आहे, याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही का, असा सवाल एका पत्रकाराने विचारला.

देशात लोक कोरोनामुळे मरत आहेत आणि परदेशातून आलेली वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवर धूळ खात पडली आहे, असा आरोप एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केला. सीएनएन वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात अनेक देशांनी वैद्यकीय मदत घेऊन आपली विमाने भारतात पाठवली होती. मात्र, ही सामुग्री रुग्णालयांमध्ये न जाता विमानतळावरच पडून आहे, असे ओवेसींनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

(PM cares fund ventilators not used by Nashik Mahanagar Palika)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.