AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागात आज, उद्या पाणीपुरवठा बंद

Navi Mumbai Water Cut News : नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय.

Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात आज, उद्या पाणीपुरवठा बंद
(प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 7:01 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी (Navi Mumbai News) आहे. खारघर, उलवे तसंच जेएनपीटी (JNPT) परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय. दोन दिवस खारघर, उलवे आणि जेएनपीटी परिसरात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं सांगण्यात आलंय. 3 जून (आज) आणि 4 जून (उद्या) असा सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणर आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय.

म्हणून पाणी पुरवठा बंद

जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आलं. त्यामुळे तातडीनं हे काम पूर्ण करण्यासाठी उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

यापूर्वी देखील तशीच परिस्थिती

याआधी 24 मे रोजी नवी मुंबई बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.दरम्यान, पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यानं नागरिकांना आताच पर्यायी व्यवस्था करुन पाण्याचा जपून वापर करावा, असं सांगण्यात आलंय. तर पालिकेकडून केल्या जाणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलंय.

खारघर, कळंबोली, पनवेल या भागाला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. वेगवेगळ्या जलवाहिन्यांद्वारे पालिका क्षेत्रात रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

पाणी जपून वापरा

3 जून आणि 4 जून असा सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय. दोन दिवस खारघर, उलवे आणि जेएनपीटी परिसरात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं सांगण्यात आलंय.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.