AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच शरद पवार काय म्हणाले? निर्णयाला उशीर…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्यभरात सर्वांकडून आनंद व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच शरद पवार काय म्हणाले? निर्णयाला उशीर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारImage Credit source: social media
| Updated on: Oct 04, 2024 | 9:03 AM
Share

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवरात्र उत्सवाला सुरूवात होतो, घटस्थापनेच्या दिवशी काल हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा निर्णय केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने राज्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा केला

माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार या विषयावर मनमोकळपणे बोलले. ‘ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी साहित्याच्या क्षेत्रातील सर्वांनी केली. साहित्य परिषदेमध्ये,अधिवेशनामध्ये ठराव करून तेथेही करण्यात आली होती. माझ्यासारखे अनेक सहकारी , ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आस्था आहे, आम्हीसुद्धा व्यक्तीगत पातळीवर केंद्र सरकारकडे मागणी करत यासंदर्भात आग्रह केला, पाठपुराव केला होता ‘, असे ते म्हणाले.

‘केंद्र सरकारने मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाषेचं महत्व वाढण्यासाठी या निर्णयाचा अतिशय उपयोग होणार आहे. यापूर्वी मराठी भाषेत जे काही लिखाण झालं आहे, पण जे फारसं लोकांच्या नजरेसमोर आलेलं नाही, ते लोकांसमोर आणण्यासाठीचा मार्ग ( मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाने) यामुळे खुला झाला. याशिवाय, नवीन पिढी काही लिहू पहात असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंबंधीची तरतूद त्यामध्ये आहे, त्याचाही लोकांना लाभ होईल’, असे शरद पवार म्हणाले.

निर्णयाला उशीर झाला पण

‘मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा हा जो निर्णय आहे, त्याला खरंतर उशीर झाला पण तरीही तो निर्णय झाला याचा आनंद आहे, त्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो’ , असा टोलाही पवार यांनी लगावला.

मराठी शाळांची संख्या कमी होत आहे

एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झालेला असताना दुसरीकडे मात्र मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या मुद्यावरून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘ ही तक्रार अनेक ठिकाणी दिसते. मराठी शाळांची संख्या कमी होत आहे.आणि शाळेत मराठी भाषा शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा कमी होत आहे, असं चित्र दिसतंय. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची ही स्थिती आहे. असंच चालू राहिल तर शाळा बंद होतील, शिक्षकांच्या नोकरीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. या प्रश्नात राज्य सरकारला लक्ष घालावंच लागेल. (मराठी शाळेत जाणाऱ्या) मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे. त्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल,’ असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...