AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!”, ‘महामोर्चा’आधी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले…

'महामोर्चा'आधी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले...

महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!, 'महामोर्चा'आधी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले...
| Updated on: Dec 17, 2022 | 12:06 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीने ‘महामोर्चा’चं (Mahavikas Aghadi Mahamorcha) आयोजन केलं आहे. महापुरूषांच्या अवमानाविरोधात मविआने हे आंदोलन पुकारलं आहे. या ‘महामोर्चा’आधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!”, असं ते म्हणालेत.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही! त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहोत. ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला निघाले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. अनेक दिवस या सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेला अपमान याच्या विरोधात हा आक्रोश आहे, असं आव्हाड म्हणालेत.

मुंबईतील हा महामोर्चा दडपण्यासाठी अशा प्रकारचा राजकारण करून ठाण्यामध्ये आंदोलन केली जात आहेत. यात नागरिकांना वेठीस धरलं जातं यात रिक्षा चालकांना मारण केलेली आहे परिवहन सेवा बंद केलेली आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला आहे. हे सर्व करून या लोकांना काहीही मिळणार नाही, असंही आव्हाड म्हणालेत.

ठाण्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला चाललेत जवळपास 5000 हून जास्त नागरिक ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. शरद पवार यांच्या समवेत मी मोर्चामध्ये सामील होत आहे, असं आव्हाडांनी सांगितलं.

‘महामोर्चा’

महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. महाविकास आघाडीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.