AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या बहिऱ्या सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर रोहित पवारांची टीका, आणखी काय म्हणाले रोहित पवार

महाराष्ट्राची आदरयुक्त भीती अनेक राज्यांना आहे. कर्नाटकला देखील आहे. पण चार महिन्यांनी तिथे निवडणुका आहे म्हणून त्यांनी अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे.

या बहिऱ्या सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर रोहित पवारांची टीका, आणखी काय म्हणाले रोहित पवार
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 17, 2022 | 10:31 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचविण्याचे काम अनेक लोकांनी केला आहे. हा विचार आमच्यासाठी महत्वाचा आहे. हा विचार हजारो वर्षांपासून आहे. त्याला आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे. आणि त्यालाच काही राजकीय लोकं ठेच पोहचवणार असतील तर ते आम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणून सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्राची अस्मिता त्यांच्यासाठी महत्वाची नाही. त्यांच्यासाठी त्यांची पार्टी, त्यांचा विचार महत्वाचा त्यांना महत्वाचा वाटतो. त्यांची लोकं त्यांना महत्वाची वाटतात, पण आम्हाला आमची महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची वाटते म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत. शिंदे सरकार माफी मांगो आंदोलन करत आहे पण राज्यपाल यांच्या विरोधात करत नाही. कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करत नाही. अनेक नेत्यांनी महराष्ट्राचा अवमान केला त्याच्या विरोधात शिंदे-फडणवीस सरकार विरोध करत नाही असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत जहरी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेत खदखद होती आणि तीच खदखद आजच्या आंदोलनातून बाहेर आली.

महाराष्ट्राची आदरयुक्त भीती अनेक राज्यांना आहे. कर्नाटकला देखील आहे. पण चार महिन्यांनी तिथे निवडणुका आहे म्हणून त्यांनी अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे.

मंत्री जेव्हा कर्नाटक मध्ये जाणार असतो तेव्हा त्यांना ते लोकं येऊ नका म्हणून इशारा देतात आणि हे जात नाही म्हणजे न झुकणारा महाराष्ट्र तिथे झुकला असा अर्थ तिथे निघाला आहे अशी टीका सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे.

याशिवाय हे सरकार बहिरे सरकार असल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली असून शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा