AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाने शिस्तीने लाखोंचे मोर्चे काढले, कुठला न्याय मिळाला ? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता, तुम्हाला जेव्हा मीडियाचा 'एम' माहित नव्हता तेव्हापासून मीडियामध्ये येतोय. मला टीव्हीबद्दल काही सांगू नका मी काय माना हलवत नाचत येत नाही. मी स्टेट येतो. मी कुठेही बाईचं नाव घेऊन, काही तरी वैयक्तिक प्रकरणं काढून बोलणं मला अजिबात आवडत नाही, मी जे बोलतो तो माझा मुद्दा असतो, प्रामाणिक असतो असे जितेंद्र आव्हाड यांनी धस यांना सुनावले आहे.

मराठा समाजाने शिस्तीने लाखोंचे मोर्चे काढले, कुठला न्याय मिळाला ? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
jitendra awhad and Suresh Dhas
| Updated on: Feb 11, 2025 | 5:14 PM
Share

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मराठ्यात फूट पाडता अशी टीका केली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी मी कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही. मी कोणाच्या सुपाऱ्या घेऊन स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायचं काम करत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनेचे उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं, महाराष्ट्राच्या माऊलीचे उत्तर होतं, पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या. जी माणसं बोलत होती की पोलिसांवर कारवाई नको जाऊ द्या.. सोडून द्या..त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर दिलं आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

हे मोर्चा.. मोर्चा.. करतात. यांच्या सरकारसमोर लाखो मराठ्यांचे मोर्चे निघाले ? काय न्याय दिला यांनी मराठा समाजाला ? सरकारला कुठेतरी जरांगे ना बाजूला करायचं आहे. त्याच्यासाठी कोणाला तरी मोठं करायचं असे हे सरकारचे काम चालु आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले. माझा स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे याला कोर्टाने शिक्षा द्यायला हवी होती. सोमनाथ सूर्यवंशी या मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे? लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत हे न्याय देणार नाहीत?अक्षय शिंदेचं मी कुठेही गुणगान गायलेलं नाही, तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण त्याला चार फुटावरून गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही, आम्ही म्हणत नाही की अक्षय शिंदेचा खून झाला. स्वतः न्यायाधीश म्हणत आहेत अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काऊंटर झालेला नाही आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे ?

त्या शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला? त्याचं फुटेज कुठे गेलं, करायचं रामने आणि भोगायचं श्या ने, का नाही आपटेंची चौकशी झाली, गुन्हा नोंदवायला का सात तास लागले या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मागितली का ? असाही सवाल सुरेश धस यांना जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता, तुमचं एवढंच काम आहे की जरांगेंना कापायचं, मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे, हे काय लोकांना कळत नाही का? असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

याचा जाब आम्ही विचारणार

ज्यांच्या घरात घुसून घुसून मारलं त्यांचं काय करायचं? ज्यांची नावं पोलीस स्टेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवले त्यांचं काय करायचं? लढाई लढणारे लोक आहेत, तुम्ही नका काळजी करू कोणाची? नावं होती आणि कोणाची नव्हती? वाकोडेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण ?, परभणीमध्ये घरात घुसून मारले, बायकांना मारले याला जवाबदार कोण? आम्ही काय पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही, मला माहित नाही हे कधीपासून फडणवीस साहेबांचे प्रवक्ते पण झालेत ते.. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा व्हिडिओ बघा, सूर्यवंशीच्या आईला ही व्यक्ती काय बोलली आहे की फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत?  सूर्यवंशीचा खून झाला आणि त्याची हत्या लपवण्याचं काम सरकार करत आहे. याचा जाब आम्ही विचारणार तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला असेही आव्हाड यांनी सुनावले आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?