AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काय घडतंय? चक्क दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काय घडतंय? चक्क दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
| Updated on: Nov 25, 2024 | 4:08 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यात निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी उद्या रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे कदाचित उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. पण तरीही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 132 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहे. पण भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत धक्कातंत्राचा अवलंब करुन नव्या चेहऱ्याचं नाव समोर केलं किंवा एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी दिली तर नवा इतिहास रचला जाणार आहे. सर्वाधिक जागांवर यश मिळवल्याने याबाबतचा निर्णय घेण्याचा सर्वाधिक अधिकार भाजपला आहेत. महायुतीच्या दिग्गजांची आज दिल्लीत भाजपच्या हायकमांडशी चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. याबाबत त्यांनी स्वत: तशी माहिती दिली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे? किंवा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काही वेगळं घडतंय का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात याबाबतच्या काही घडामोडी आगामी काळात घडतील तर ते स्पष्ट होईलच. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावात निवडणूक लढवली. शरद पवार गटाचे देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील यांच्यात लढत झाली. वळसे पाटील यांचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे. पण तरीही देवदत्त निकम यांनी त्यांना टफ फाईट दिली. कारण त्यांच्यामागे शरद पवार यांचं पाठबळ होतं. शरद पवारांनी आंबेगावात सभादेखील घेतली होती. यामुळे मतमोजणीच्या शेवटच्या घटकेपर्यंत सस्पेन्स राहीला. अखेर अटीतटीच्या या लढतीत दिलीप वळसे पटील यांचा निसटता विजय झाला. ते अवघ्या हजार मतांनी विजयी झाले.

या विजयानंतर दिलीप वळसे पाटील आज शरद पवारांच्या भेटीला आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी फार बोलणं टाळलं. पण त्यांनी चार वाक्यात प्रतिक्रिया नक्की दिली. “इथे मी पवार साहेबांची (शरद पवार यांची) भेट घेणार आहे. काही नाही, फक्त नमस्कार करणार. राजकीय चर्चा नाही. फक्त प्रतिष्ठानची बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी आलो आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.