AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी महाविकासाआघाडीत कोण मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला कसा ठरणार याबद्दल सांगितले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
| Updated on: Sep 04, 2024 | 12:22 PM
Share

Sharad Pawar Om CM Formula : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकाआघाडीत जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे. त्यातच आता महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी महाविकासाआघाडीत कोण मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला कसा ठरणार याबद्दल सांगितले आहे.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगावा, आपण त्याला पाठिंबा देऊ, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. आता नुकतंच कोल्हापुरात एक पत्रकार परिषद पार पड”ली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाविकासआघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला कसा असणार याबद्दल भाष्य केले आहे. नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ, असे शरद पवारांनी यावेळी म्हटले.

“लाडकी बहीण योजनेवरुन जर सरकारमध्ये वाद होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. येत्या दोन महिन्यांनी आम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे सहकारी असलो, तरी एका विचाराने जनतेसमोर जाणार आहोत. हे बाकीचे लाडके या पद्धतीने जाणार ही चांगली गोष्ट आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही”

“मुख्यमंत्रिपदाचं घोडं अजिबात कुठेही अडलेलं नाही. असा विचार करण्याचे काहीही कारण नाही. अनेक वेळेला असं घडलंय की नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्याच्या नंतर संख्याबळ ठरवून निर्णय घ्यायचा असतो. आता अजून निवडणुकांचा पत्ता नाही. राज्यात बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही”, असे शरद पवार म्हणाले.

एक स्थिर सरकार या राज्यात आणू

“मी तुम्हाला यापूर्वीचं एक उदाहरण सांगतो, १९७७ साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकीवेळी कोणाताही चेहरा नव्हता. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन केले. एकत्र आले, निवडणुका लढल्या, निकाल लागल्यानंतर मुरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं गेलं. निवडणुकीत मतं मागताना कधीही मुरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे, हा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचाराने लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार या राज्यात आणू”, असेही शरद पवारांनी म्हटले.

Follow Us
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं