AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात

नुसतं तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसतं भाषण म्हणतात. राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि सेना भवन मध्ये फक्त भाषण झालं. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात
नितेश राणे
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 5:56 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितश राणे (Nitesh Rane) हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक झाले आहेत. महाराष्ट्रात सहकाराचा एक मोठा इतिहास आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank)दोन तीन टर्म राणे साहेबांच्या ताब्यात आहे. राणे कुटुंबातील पहिला संचालक आज बनला आहे.जिल्ह्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक करणार अशी प्रतिक्रिया यावेळी नितेश राणे यांनी दिली तर संजय राऊतांचा (Sanjay Raut) पुन्हा समाचार घेतला आहे. योग्य माहीती आणि भूमिका समजते म्हणून पत्रकार परिषद महत्वाची असते. नुसतं तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसतं भाषण म्हणतात. राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि सेना भवन मध्ये फक्त भाषण झालं. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राऊतांनी घामाघूम होत भाषण केलं

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला मी पत्रकार परिषद म्हणणार नाही.ते एकतर्फी बोलले.हिंमत असती तर प्रश्न उत्तर घेतली असती,घाम पुसत पुसत केलेलं भाषण होत ते. स्वतः पत्रकार असून पत्रकारांवर अन्याय करत असाल तर स्वतःच्या पेशाशी तुमची निष्ठा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच पोलीस आणि प्रशासन हे आदेशावर चालत.राज्यकर्ते आदेश देतात तसं ते चालतात. सत्ताधारी लोकांची मानसिकता काय याचे प्रतिबिंब पोलीस आणि प्रशासन यामध्ये दिसते.पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही, याला जबाबदार सत्ताधारी आहेत. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राजकारणाची पातळी घसरली 

तसचे राणे साहेबांनी जेव्हा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सभागृहात भांडूनही नंतर विलासराव आणि राणे साहेब एका डब्यात जेवायचे.ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही पण कुठंतरी चुकलं आहोत, मात्र राजकारणाची पतळी घसरली आहे. ती चुकीची आहे. घरात घुसत असताना त्यांची मुलं त्यांचे आईवडील असतात याच भान ठेवून अधिकाऱ्यांनी घरात घुसवायला हवं, असेही ते म्हणाले आहेत. तसेच संतोष परब प्रकरणावेळी जर नितेश राणे आजारी नव्हते तर तुमचे डॉक्टर तसे रिपोर्ट का देत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोर्टात पुरावे देऊन बोला

किरीट सोमय्यांच्या आरोपावर बोलताना,किरीट सोमय्या खरं किंवा खोटं बोलत असतील तर कागदपत्रांनुसार तुम्ही लढा ना.तुम्ही थांबवायचा का प्रयत्न करताय? तिथेच चोरी दिसते.काही दिवसांअगोदर मी वरळीला मच्छीमारांना भेटायला जात होतो. तिथेही शिवसैनिक जमा झाले होते.किरीट सोमय्या,राणे साहेब,नितेश राणे जर खोटं बोलत असतील तर कागदाने त्यांना उघडं करा ना. कोर्टात कागद चालतो तिथे घोषणा चालत नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच अधिश बंगल्याबाबत बोलताना तो कायदेशीर विषय आहे.आम्ही कायद्याने त्याला उत्तर देणार आहोत.आम्ही कुठेही पळून जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मोदींच्या भाषणात अहमदाबाद, गांधीनगरचा उल्लेख, मुंबई हायस्पीड ट्रेनचा मुद्दा पुन्हा तापणार?

अमरावती आयुक्तांवरील शाई फेक प्रकरण, आरोपींच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

सरकार लुटारूंच्या पाठिमागे उभा, कारखानदार, साखर आयुक्त ताटाखालचे मांजर-राजू शेट्टी

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.