AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात

नुसतं तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसतं भाषण म्हणतात. राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि सेना भवन मध्ये फक्त भाषण झालं. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात
नितेश राणे
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 5:56 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितश राणे (Nitesh Rane) हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक झाले आहेत. महाराष्ट्रात सहकाराचा एक मोठा इतिहास आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank)दोन तीन टर्म राणे साहेबांच्या ताब्यात आहे. राणे कुटुंबातील पहिला संचालक आज बनला आहे.जिल्ह्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक करणार अशी प्रतिक्रिया यावेळी नितेश राणे यांनी दिली तर संजय राऊतांचा (Sanjay Raut) पुन्हा समाचार घेतला आहे. योग्य माहीती आणि भूमिका समजते म्हणून पत्रकार परिषद महत्वाची असते. नुसतं तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसतं भाषण म्हणतात. राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि सेना भवन मध्ये फक्त भाषण झालं. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राऊतांनी घामाघूम होत भाषण केलं

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला मी पत्रकार परिषद म्हणणार नाही.ते एकतर्फी बोलले.हिंमत असती तर प्रश्न उत्तर घेतली असती,घाम पुसत पुसत केलेलं भाषण होत ते. स्वतः पत्रकार असून पत्रकारांवर अन्याय करत असाल तर स्वतःच्या पेशाशी तुमची निष्ठा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच पोलीस आणि प्रशासन हे आदेशावर चालत.राज्यकर्ते आदेश देतात तसं ते चालतात. सत्ताधारी लोकांची मानसिकता काय याचे प्रतिबिंब पोलीस आणि प्रशासन यामध्ये दिसते.पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही, याला जबाबदार सत्ताधारी आहेत. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राजकारणाची पातळी घसरली 

तसचे राणे साहेबांनी जेव्हा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सभागृहात भांडूनही नंतर विलासराव आणि राणे साहेब एका डब्यात जेवायचे.ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही पण कुठंतरी चुकलं आहोत, मात्र राजकारणाची पतळी घसरली आहे. ती चुकीची आहे. घरात घुसत असताना त्यांची मुलं त्यांचे आईवडील असतात याच भान ठेवून अधिकाऱ्यांनी घरात घुसवायला हवं, असेही ते म्हणाले आहेत. तसेच संतोष परब प्रकरणावेळी जर नितेश राणे आजारी नव्हते तर तुमचे डॉक्टर तसे रिपोर्ट का देत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोर्टात पुरावे देऊन बोला

किरीट सोमय्यांच्या आरोपावर बोलताना,किरीट सोमय्या खरं किंवा खोटं बोलत असतील तर कागदपत्रांनुसार तुम्ही लढा ना.तुम्ही थांबवायचा का प्रयत्न करताय? तिथेच चोरी दिसते.काही दिवसांअगोदर मी वरळीला मच्छीमारांना भेटायला जात होतो. तिथेही शिवसैनिक जमा झाले होते.किरीट सोमय्या,राणे साहेब,नितेश राणे जर खोटं बोलत असतील तर कागदाने त्यांना उघडं करा ना. कोर्टात कागद चालतो तिथे घोषणा चालत नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच अधिश बंगल्याबाबत बोलताना तो कायदेशीर विषय आहे.आम्ही कायद्याने त्याला उत्तर देणार आहोत.आम्ही कुठेही पळून जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मोदींच्या भाषणात अहमदाबाद, गांधीनगरचा उल्लेख, मुंबई हायस्पीड ट्रेनचा मुद्दा पुन्हा तापणार?

अमरावती आयुक्तांवरील शाई फेक प्रकरण, आरोपींच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

सरकार लुटारूंच्या पाठिमागे उभा, कारखानदार, साखर आयुक्त ताटाखालचे मांजर-राजू शेट्टी

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.